Maharashtra Monsoon: राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा(monsoon) जोर वाढला आहे.राज्याच्या अनेक भागांमध्ये दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण कोकण, गोवा येथे पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


दरम्यान यावेळेस पावसासोबत वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. त्यामुळे येथे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट व्यक्त केला आहे.



मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस


मुंबईतही हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊश कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो.



परतीचा पाऊस


राज्यात ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम्यान मान्सून परतणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह