सरकारकडून समर्थन नाही,अफगाण दूतावासने बंद केले भारतातील कामकाज

Share

नवी दिल्ली: अफगाणिस्तानने(afganistan) रविवारी १ ऑक्टोबरपासून भारतातील आपले दूतावास(embassy) पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे. दूतावासने म्हटले की सध्याच्या सरकारच्या कमी समर्थनामुळे आणि अफगाणिस्तानचे हित पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. दूतावासने म्हटले की, दूतावासाला सध्याच्या सरकारकडून समर्थन मिळत नाही आहे यामुळे आमच्या कामकाजात अडथळे येत आहेत.

समोर आलेल्या विधानानुसार, खूप दु:ख,खिन्नता आणि निराशेसह हे बोलावे लागत आहे की नवी दिल्लीत अफगाणिस्तानने आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि दीर्घकालीन भागीदारीला लक्षात घेता सावधानतेने विचार-विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या दूतावासांनी भारत देश सोडला

दूतावासाच्या तीन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रॉयटर्सला सांगितले की हा घटनाक्रम अफगाण दूतावासाचे राजदूत आणि अन्य वरिष्ठ राजनायकांना भारत सोडून युरोपात जाण्यासाठी आणि संयुक्त राज्य अमेरिकेत शरण घेतल्यानंतर झाला. दूतावासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कमीत कमी पाच अफगाण राजदूतांनी भारत सोडला आहे.

२०२१मध्ये अफगाणमध्ये भारतीय दूतावास झाले होते बंद

२०२१मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर भारताने अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केले होते. दरम्यान, भारत सरकारने अपदस्थ राष्ट्रपती अश्रफ गनीद्वारे नियुक्त राजदूत आणि मिशन स्टाफला भारतात व्हिसा जारी करण्यासाठी आणि व्यापार प्रकरणे सांभाळण्याची परवानगी दिली होती.

Recent Posts

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…

4 mins ago

AI voice scam : नोकरी शोधून देता देता छोकरीलाच पटवलं आणि घातला ७ लाखांचा गंडा!

AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…

37 mins ago

Pune crime : स्वारगेटच्या मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश! तब्बल १२० मोबाईल आणि ३ लॅपटॉप जप्त

प्रवाशांनी सावध राहण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन पुणे : पुण्यातील धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच असून रोज…

1 hour ago

Rahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे ‘ही’ खास मागणी!

म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…

2 hours ago

Nashik news : नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी थांबवली! काय आहे कारण?

नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…

2 hours ago

Yavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात  यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…

3 hours ago