सरकारकडून समर्थन नाही,अफगाण दूतावासने बंद केले भारतातील कामकाज

नवी दिल्ली: अफगाणिस्तानने(afganistan) रविवारी १ ऑक्टोबरपासून भारतातील आपले दूतावास(embassy) पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे. दूतावासने म्हटले की सध्याच्या सरकारच्या कमी समर्थनामुळे आणि अफगाणिस्तानचे हित पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. दूतावासने म्हटले की, दूतावासाला सध्याच्या सरकारकडून समर्थन मिळत नाही आहे यामुळे आमच्या कामकाजात अडथळे येत आहेत.


समोर आलेल्या विधानानुसार, खूप दु:ख,खिन्नता आणि निराशेसह हे बोलावे लागत आहे की नवी दिल्लीत अफगाणिस्तानने आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि दीर्घकालीन भागीदारीला लक्षात घेता सावधानतेने विचार-विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



अफगाणिस्तानच्या दूतावासांनी भारत देश सोडला


दूतावासाच्या तीन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रॉयटर्सला सांगितले की हा घटनाक्रम अफगाण दूतावासाचे राजदूत आणि अन्य वरिष्ठ राजनायकांना भारत सोडून युरोपात जाण्यासाठी आणि संयुक्त राज्य अमेरिकेत शरण घेतल्यानंतर झाला. दूतावासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कमीत कमी पाच अफगाण राजदूतांनी भारत सोडला आहे.



२०२१मध्ये अफगाणमध्ये भारतीय दूतावास झाले होते बंद


२०२१मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर भारताने अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केले होते. दरम्यान, भारत सरकारने अपदस्थ राष्ट्रपती अश्रफ गनीद्वारे नियुक्त राजदूत आणि मिशन स्टाफला भारतात व्हिसा जारी करण्यासाठी आणि व्यापार प्रकरणे सांभाळण्याची परवानगी दिली होती.

Comments
Add Comment

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबियामध्ये मोठा निर्णय; ‘कफला’ पद्धतीचा शेवट, भारतीय कामगारांना मोठा दिलासा

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्ये गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफला पद्धत अखेर रद्द करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या

ट्रम्प यांचा ८८ लाख रुपयांचा एच-१बी 'व्हिसा बॉम्ब' आजपासून लागू, जाणून घ्या कोणाला सूट मिळणार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, H-1B