सरकारकडून समर्थन नाही,अफगाण दूतावासने बंद केले भारतातील कामकाज

नवी दिल्ली: अफगाणिस्तानने(afganistan) रविवारी १ ऑक्टोबरपासून भारतातील आपले दूतावास(embassy) पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे. दूतावासने म्हटले की सध्याच्या सरकारच्या कमी समर्थनामुळे आणि अफगाणिस्तानचे हित पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. दूतावासने म्हटले की, दूतावासाला सध्याच्या सरकारकडून समर्थन मिळत नाही आहे यामुळे आमच्या कामकाजात अडथळे येत आहेत.


समोर आलेल्या विधानानुसार, खूप दु:ख,खिन्नता आणि निराशेसह हे बोलावे लागत आहे की नवी दिल्लीत अफगाणिस्तानने आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि दीर्घकालीन भागीदारीला लक्षात घेता सावधानतेने विचार-विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.



अफगाणिस्तानच्या दूतावासांनी भारत देश सोडला


दूतावासाच्या तीन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रॉयटर्सला सांगितले की हा घटनाक्रम अफगाण दूतावासाचे राजदूत आणि अन्य वरिष्ठ राजनायकांना भारत सोडून युरोपात जाण्यासाठी आणि संयुक्त राज्य अमेरिकेत शरण घेतल्यानंतर झाला. दूतावासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कमीत कमी पाच अफगाण राजदूतांनी भारत सोडला आहे.



२०२१मध्ये अफगाणमध्ये भारतीय दूतावास झाले होते बंद


२०२१मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर भारताने अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केले होते. दरम्यान, भारत सरकारने अपदस्थ राष्ट्रपती अश्रफ गनीद्वारे नियुक्त राजदूत आणि मिशन स्टाफला भारतात व्हिसा जारी करण्यासाठी आणि व्यापार प्रकरणे सांभाळण्याची परवानगी दिली होती.

Comments
Add Comment

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले

बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत ४७.९१ टक्के मतदान, मतमोजणीला सुरुवात

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये मोठी दंगल उसळली आणि शेख हसीना यांनी देश सोडला. सध्या त्या भारतात सुरक्षित ठिकाणी

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना