Wednesday, July 3, 2024
Homeमहत्वाची बातमीसरकारकडून समर्थन नाही,अफगाण दूतावासने बंद केले भारतातील कामकाज

सरकारकडून समर्थन नाही,अफगाण दूतावासने बंद केले भारतातील कामकाज

नवी दिल्ली: अफगाणिस्तानने(afganistan) रविवारी १ ऑक्टोबरपासून भारतातील आपले दूतावास(embassy) पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे. दूतावासने म्हटले की सध्याच्या सरकारच्या कमी समर्थनामुळे आणि अफगाणिस्तानचे हित पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. दूतावासने म्हटले की, दूतावासाला सध्याच्या सरकारकडून समर्थन मिळत नाही आहे यामुळे आमच्या कामकाजात अडथळे येत आहेत.

समोर आलेल्या विधानानुसार, खूप दु:ख,खिन्नता आणि निराशेसह हे बोलावे लागत आहे की नवी दिल्लीत अफगाणिस्तानने आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि दीर्घकालीन भागीदारीला लक्षात घेता सावधानतेने विचार-विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या दूतावासांनी भारत देश सोडला

दूतावासाच्या तीन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रॉयटर्सला सांगितले की हा घटनाक्रम अफगाण दूतावासाचे राजदूत आणि अन्य वरिष्ठ राजनायकांना भारत सोडून युरोपात जाण्यासाठी आणि संयुक्त राज्य अमेरिकेत शरण घेतल्यानंतर झाला. दूतावासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कमीत कमी पाच अफगाण राजदूतांनी भारत सोडला आहे.

२०२१मध्ये अफगाणमध्ये भारतीय दूतावास झाले होते बंद

२०२१मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर भारताने अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केले होते. दरम्यान, भारत सरकारने अपदस्थ राष्ट्रपती अश्रफ गनीद्वारे नियुक्त राजदूत आणि मिशन स्टाफला भारतात व्हिसा जारी करण्यासाठी आणि व्यापार प्रकरणे सांभाळण्याची परवानगी दिली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -