Ganesh Immersion : मुरूड एकदरा व मजगाव खाडीतून २११ बाप्पांचे श्री सदस्यांनी केले पुनर्विसर्जन...

  71

मुरूड : मुरुड एकदरा व मजगाव खाडीतून सुमारे २११ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे श्री सदस्यांनी पुनर्विसर्जन केले. पहाटे पाच वाजल्यापासून सुमारे २५ ते ३० श्री सदस्यांनी खाडीमध्ये विसर्जित केलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुरुड एकदरा व मजगाव खाडीतून २११ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती मिळाल्या.


बैठकीच्या माध्यमातून मुरुड मधील श्री सदस्य दरवर्षी या खाडीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढून खोल समुद्रात नेऊन विसर्जित करीत आहेत. याही वेळेला हे गणपती काढण्यात आले हे सर्व गणपती बोटीच्या सहाय्याने परिसरातील खोल समुद्रात नेऊन विसर्जित करण्यात आले. मुरुड एकदरा व मजगाव खाडी उथळ असल्याकारणाने पाण्याच्या ओहोटीला या सर्व गणपती मूर्ती वर येतात. या मूर्तींची विटंबना होऊ नये या उद्देशाने हे श्री सदस्य ही सेवा करीत असतात.


शाडू माती पासून तयार होणाऱ्या मूर्ती महाग असल्याकारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाडू मातीच्या मूर्ती काही तासातच विरघळतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून नानासाहेब प्रतिष्ठान तर्फे श्री सदस्यांनी शाडू मातीच्या मूर्ती आणाव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणू नयेत असे आवाहन केले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या