IND vs AUS: तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६६ धावांनी विजय, भारताचा मालिका विजय

  96

राजकोट: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेचा शेवट गोड केला. याआधीच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा भारतासाठी औपचारिक होता.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर डेविड वॉर्नरने ५६ धावांची खेळी केली तर मिचेल मार्शने ९६ धावा फटकावल्या. त्यानंतर आलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथने ७४ धावांची खेळी केली. तर मार्नस लांबुशग्ने यांने ७२ धावांची खेळी केली. यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावताना ३५२ धावा केल्या होत्या आणि भारताला ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते.


त्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात उतरले. भाराताच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या सामन्यात संधी देण्यात आली होती. त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. कर्णधार रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही.


रवींद्र जडेजाने ३५ धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज साफ अयशस्वी ठरले. त्यामुळे भारताला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. भारताचा संपूर्ण डाव २८६ धावांवर आटोपला. यासोबतच भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे