IND vs AUS: तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६६ धावांनी विजय, भारताचा मालिका विजय

राजकोट: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेचा शेवट गोड केला. याआधीच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा भारतासाठी औपचारिक होता.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर डेविड वॉर्नरने ५६ धावांची खेळी केली तर मिचेल मार्शने ९६ धावा फटकावल्या. त्यानंतर आलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथने ७४ धावांची खेळी केली. तर मार्नस लांबुशग्ने यांने ७२ धावांची खेळी केली. यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावताना ३५२ धावा केल्या होत्या आणि भारताला ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते.


त्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात उतरले. भाराताच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या सामन्यात संधी देण्यात आली होती. त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. कर्णधार रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही.


रवींद्र जडेजाने ३५ धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज साफ अयशस्वी ठरले. त्यामुळे भारताला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. भारताचा संपूर्ण डाव २८६ धावांवर आटोपला. यासोबतच भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे