राजकोट: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेचा शेवट गोड केला. याआधीच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा भारतासाठी औपचारिक होता.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर डेविड वॉर्नरने ५६ धावांची खेळी केली तर मिचेल मार्शने ९६ धावा फटकावल्या. त्यानंतर आलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथने ७४ धावांची खेळी केली. तर मार्नस लांबुशग्ने यांने ७२ धावांची खेळी केली. यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावताना ३५२ धावा केल्या होत्या आणि भारताला ३५३ धावांचे आव्हान ठेवले होते.
त्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात उतरले. भाराताच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या सामन्यात संधी देण्यात आली होती. त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. कर्णधार रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही.
रवींद्र जडेजाने ३५ धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाज साफ अयशस्वी ठरले. त्यामुळे भारताला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. भारताचा संपूर्ण डाव २८६ धावांवर आटोपला. यासोबतच भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला.
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…