World Cup 2023: प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार पाकिस्तान -न्यूझीलंड सामना

Share

नवी दिल्ली: भारतात या वर्षी ५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप २०२३(world cup 2023) सुरू होणार आहे आणि फायनल सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. वर्ल्डकपआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात २९ सप्टेंबरला होणारा वर्ल्डकप २०२३चा वार्मअप सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने केलेले हे विधान आश्चर्यचकित करणार आहे.

प्रेक्षकांशिवाय पाहिला जाणार पाकिस्तान-न्यूझीलंड सामना

हैदराबाद पोलिसांनी २९ सप्टेंबरला वर्ल्डकपच्या वॉर्म अप सामन्यातील हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याबाबत असमर्थतता जाहीर केली. या सामन्याच्या आधी हैदराबादमध्ये गणेश विसर्जन आणि मिलाद उन नबी हे सण आहेत. याच कारणामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी मिळणार नाही. बीसीसीआयने याबाबत मोठे अपडेट दिले आहेत.

५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरूवात

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप ५ ऑक्टोबर २०२३ पासून १९ नोव्हेंबरपर्यंत भारताच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. स्पर्धेत १० संघ भाग घेणार आहेत. एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक ५ वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. याशिवाय भारत आणि वेस्ट इंडिज २-२ वेळा आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.

२०२३च्या वर्ल्डकपची सुरूवात माजी विजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर २०२३ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या सामन्याची वेळ सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी २ वाजता खेळवले जाणार आहेत.

Recent Posts

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

11 mins ago

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…

50 mins ago

Horoscope: जुलै महिन्यात या ४ राशींचे जीवन होणार सुखकर, होणार हे बदल

मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…

1 hour ago

Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…

2 hours ago

आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…

3 hours ago

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

4 hours ago