S Jaishankar : आता केवळ काही देशांचाच अजेंडा चालणार नाही - एस. जयशंकर

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांनी अतिशय मुद्देसूदपणे भारताची बाजू मांडली आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना म्हटले, भारताकडून नमस्कार! यानंतर ते म्हणाले , कोरोना काळानंतर जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. विकसित देशांवर सर्वाधिक दबाव आहे. विश्वासाची पुर्ननिर्मिती आणि जागतिक एकजूट पुन्हा एकदा जागवण्यासाठी यूएनजीएच्या विषयाला आमचे पूर्ण समर्थन आहे.


यावेळी जयशंकर यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षतेबाबत कौतुक केले. कौतुक करताना ते म्हणाले की आफ्रीकन युनियन जी-२० संघटनेचा भाग बनला हे भारताचे यश आहे. प्रत्येक संकटकाळात भारताने पुढे होत मदत केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी नाव न घेता कॅनडावर टीका केली. राजकीय सुविधेची मदत घेत दहशतवादावर कारवाई योग्य नाही. सार्वभौमत्वाची काळजी घेतली गेली पाहिजे.


याशिवाय आपल्या भाषणात त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदलाबाबत भारताने केलेल्या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले, काळ बदलत आहे, आता दुसऱ्या देशांचे ऐकावे लागेल. फक्त काही देशांचाच अजेंडा जगावर थोपवला जाऊ शकत नाही. एखादा देश अजेंडा ठरवेल आणि दुसरे देश त्याच्यासोबत जातील हे दिवस संपेल.

Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले