S Jaishankar : आता केवळ काही देशांचाच अजेंडा चालणार नाही - एस. जयशंकर

  85

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांनी अतिशय मुद्देसूदपणे भारताची बाजू मांडली आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना म्हटले, भारताकडून नमस्कार! यानंतर ते म्हणाले , कोरोना काळानंतर जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. विकसित देशांवर सर्वाधिक दबाव आहे. विश्वासाची पुर्ननिर्मिती आणि जागतिक एकजूट पुन्हा एकदा जागवण्यासाठी यूएनजीएच्या विषयाला आमचे पूर्ण समर्थन आहे.


यावेळी जयशंकर यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षतेबाबत कौतुक केले. कौतुक करताना ते म्हणाले की आफ्रीकन युनियन जी-२० संघटनेचा भाग बनला हे भारताचे यश आहे. प्रत्येक संकटकाळात भारताने पुढे होत मदत केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी नाव न घेता कॅनडावर टीका केली. राजकीय सुविधेची मदत घेत दहशतवादावर कारवाई योग्य नाही. सार्वभौमत्वाची काळजी घेतली गेली पाहिजे.


याशिवाय आपल्या भाषणात त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदलाबाबत भारताने केलेल्या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. ते म्हणाले, काळ बदलत आहे, आता दुसऱ्या देशांचे ऐकावे लागेल. फक्त काही देशांचाच अजेंडा जगावर थोपवला जाऊ शकत नाही. एखादा देश अजेंडा ठरवेल आणि दुसरे देश त्याच्यासोबत जातील हे दिवस संपेल.

Comments
Add Comment

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक