IND vs AUS: तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका

नवी दिल्ली: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात तिसरा वनडे सामना बुधवारी रंगत आहे. राजकोटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल प्लेईंग ११चा हिस्सा असणार नाही.



या खेळाडूंशिवाय उतरणार टीम इंडिया


हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल मालिकेच्या पहिल्या २ वनडे भारतीय प्लेईंग ११चा हिस्सा नव्हता. मात्र असे मानले जात होते की राजकोट वनडे सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल भारतीय प्लेईंग ११मध्ये पुनरागमन होऊ शकते.


हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर तिसऱ्या वनडेत भाग घेणार नाहीत. शुभमन गिलने इंदौरमध्ये शानदार शतक ठोकले होते. या सामन्यात शुभमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. त्यांनी आपल्य डावात ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते.



राजकोटमध्ये खेळवला जाणार तिसरा वनडे


हार्दिक पांड्याशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षऱ पटेलला प्लेईंग ११मध्ये नसणे टीम इंडियासाठी मोठा झटका मानला जात आहे. मात्र भारतीय टीमसाठी चांगली बाब म्हणजे ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.


Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य