IND vs AUS: तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका

  84

नवी दिल्ली: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात तिसरा वनडे सामना बुधवारी रंगत आहे. राजकोटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल प्लेईंग ११चा हिस्सा असणार नाही.



या खेळाडूंशिवाय उतरणार टीम इंडिया


हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल मालिकेच्या पहिल्या २ वनडे भारतीय प्लेईंग ११चा हिस्सा नव्हता. मात्र असे मानले जात होते की राजकोट वनडे सामन्यासाठी हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल भारतीय प्लेईंग ११मध्ये पुनरागमन होऊ शकते.


हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर तिसऱ्या वनडेत भाग घेणार नाहीत. शुभमन गिलने इंदौरमध्ये शानदार शतक ठोकले होते. या सामन्यात शुभमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. त्यांनी आपल्य डावात ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते.



राजकोटमध्ये खेळवला जाणार तिसरा वनडे


हार्दिक पांड्याशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि अक्षऱ पटेलला प्लेईंग ११मध्ये नसणे टीम इंडियासाठी मोठा झटका मानला जात आहे. मात्र भारतीय टीमसाठी चांगली बाब म्हणजे ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.


Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार