Asian Games: आशियाई गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी भारताची धमाकेदार सुरूवात, मिळाले पहिले सुवर्ण

  101

होंगझाऊ: चीनच्या होंगझाऊमध्ये खेळवल्या जात असलेल्या १९व्या आशियाई गेम्सचा(asian games) आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची भारताची सुरूवात जबरदस्त झाली. भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.


पुरुष १० मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील दिव्यांश पवार या त्रिकुटाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर भारताने रोईंगमध्येही कांस्यपदक पटकावले. रोईंगच्या मेन्स फोर स्पर्धेत जसविंदर, आशिष, पुनीत आणि आशीषने कांस्यपदक मिळवले.


१९व्या आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पाच पदके मिळवली होती. पहिले पदक नेमबाजीत मिळाले होते. मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवले होते.


त्यानंतर रोईंगमध्ये भारताला दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळाले होते. त्यानंतर रमिता जिंदलने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतासाठी कांस्यपदक मिळवले होते.

Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.