Chandrayaan-3:चंद्रावर कधी जागे होणार लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान? इस्त्रोने दिले मोठे अपडेट

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)(isro) ६ ऑक्टोबरपर्यंत चंद्र सूर्यास्तापर्यंत विक्रम लँड आणि प्रज्ञान रोव्हर यांना जागे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्य उगवल्यानंतर एक दिवसांनी शनिवारी अंतराळ संस्थ्येच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३(chandrayaan 3) मोहिमेच्या बोनस फेसला सुरू केले होते. इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की यावेळेस उपकरणांशी कधी संपर्क साधला जाईल याबाबत कोणतीही मर्यादा नाही.


आम्हाला नाही माहीत हे कधी जागे होतील. उद्या अथवा परवा अथवा लूनार डेच्या दिवशीही जागे होऊ शकतात. आम्ही प्रयत्न करत आहोत. जर लँडर आणि रोव्हर जागे झाले तर हे मोठे यश असेल.


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार लँडर आणि रोव्हर एक लुनार डे आणि -२०० ते -२५० डिग्री सेल्सियसच्या कमी तापमानात वेळ घालवल्यानंतर ते निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र शास्त्रज्ञांना आशा आहे की जसे जसे लूनार डे पुढे जाईल आणि चंद्राच्या पृ्ष्ठभागावरील तापमान वाढेल याचे जागे होण्याची शक्यता वाढेल.



फक्त रोव्हरसाठी करण्यात आला प्रयोग


याआधी सोमनाथने सांगितले होते की रोव्हरचे परीक्षण कमी तापमानात जिवंत राहण्यासाठी करण्यात आले आहे. तर लँडर विक्रमसाठी असे करण्यात आलेले नाही. त्यांनी सांगितले होते की रोव्हरचे पूर्णपणे परीक्षण करण्यात आले आहे मात्र प्रज्ञान आणि विक्रम यांचे डिझाईन साधारण एकसारखेच आहे. याचा अर्थ जे परीक्षण प्रज्ञानसाठी उपयुक्त आहे तेच विक्रमसाठीही आहे.



बॅटरींना केले होते चार्ज


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार उपकरणे निष्क्रिय करण्याआधी बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यात आल्या होत्या. त्यातील सौर पॅनेल या पद्धतीने उन्मुख करण्यात आले होते की सूर्य उगवताच त्यांना प्रकाश मिळावा.

Comments

Nilesh Borate    September 25, 2023 07:16 PM

No comments

Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात