Chandrayaan-3:चंद्रावर कधी जागे होणार लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान? इस्त्रोने दिले मोठे अपडेट

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)(isro) ६ ऑक्टोबरपर्यंत चंद्र सूर्यास्तापर्यंत विक्रम लँड आणि प्रज्ञान रोव्हर यांना जागे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्य उगवल्यानंतर एक दिवसांनी शनिवारी अंतराळ संस्थ्येच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३(chandrayaan 3) मोहिमेच्या बोनस फेसला सुरू केले होते. इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की यावेळेस उपकरणांशी कधी संपर्क साधला जाईल याबाबत कोणतीही मर्यादा नाही.


आम्हाला नाही माहीत हे कधी जागे होतील. उद्या अथवा परवा अथवा लूनार डेच्या दिवशीही जागे होऊ शकतात. आम्ही प्रयत्न करत आहोत. जर लँडर आणि रोव्हर जागे झाले तर हे मोठे यश असेल.


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार लँडर आणि रोव्हर एक लुनार डे आणि -२०० ते -२५० डिग्री सेल्सियसच्या कमी तापमानात वेळ घालवल्यानंतर ते निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र शास्त्रज्ञांना आशा आहे की जसे जसे लूनार डे पुढे जाईल आणि चंद्राच्या पृ्ष्ठभागावरील तापमान वाढेल याचे जागे होण्याची शक्यता वाढेल.



फक्त रोव्हरसाठी करण्यात आला प्रयोग


याआधी सोमनाथने सांगितले होते की रोव्हरचे परीक्षण कमी तापमानात जिवंत राहण्यासाठी करण्यात आले आहे. तर लँडर विक्रमसाठी असे करण्यात आलेले नाही. त्यांनी सांगितले होते की रोव्हरचे पूर्णपणे परीक्षण करण्यात आले आहे मात्र प्रज्ञान आणि विक्रम यांचे डिझाईन साधारण एकसारखेच आहे. याचा अर्थ जे परीक्षण प्रज्ञानसाठी उपयुक्त आहे तेच विक्रमसाठीही आहे.



बॅटरींना केले होते चार्ज


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार उपकरणे निष्क्रिय करण्याआधी बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यात आल्या होत्या. त्यातील सौर पॅनेल या पद्धतीने उन्मुख करण्यात आले होते की सूर्य उगवताच त्यांना प्रकाश मिळावा.

Comments

Nilesh Borate    September 25, 2023 07:16 PM

No comments

Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन