IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मालिका जिंकली, दुसऱ्या सामन्यात ९९ धावांनी विजय

इंदौर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने(india vs australia) डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या. या सामन्यात शुभमन गिल तसेच श्रेयस अय्यरने जबरदस्त शतके ठोकली. तर सूर्यकुमार यादवनेही तडाखेबंद खेळी केली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर आटोपला.


भारताचे रवीचंद्रन अश्निन आणि रवींद्र जडेजा यांनी घेतलेले प्रत्येकी ३ विकेट तसेच प्रसिद्ध कृष्णाने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडता आला नाही.


भारताने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत नवा रेकॉर्ड निर्माण केला. शुभमन गिलने १०४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. कर्णधार लोकेश राहुलने ५२ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ७२ धावा तडकावल्या.


भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचा फायदा त्यांना नक्कीच आगामी वर्ल्डकपमध्ये होईल.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात