इंदौर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने(india vs australia) डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या. या सामन्यात शुभमन गिल तसेच श्रेयस अय्यरने जबरदस्त शतके ठोकली. तर सूर्यकुमार यादवनेही तडाखेबंद खेळी केली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर आटोपला.
भारताचे रवीचंद्रन अश्निन आणि रवींद्र जडेजा यांनी घेतलेले प्रत्येकी ३ विकेट तसेच प्रसिद्ध कृष्णाने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडता आला नाही.
भारताने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत नवा रेकॉर्ड निर्माण केला. शुभमन गिलने १०४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. कर्णधार लोकेश राहुलने ५२ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ७२ धावा तडकावल्या.
भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचा फायदा त्यांना नक्कीच आगामी वर्ल्डकपमध्ये होईल.
नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…
इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…