IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मालिका जिंकली, दुसऱ्या सामन्यात ९९ धावांनी विजय

  115

इंदौर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने(india vs australia) डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या. या सामन्यात शुभमन गिल तसेच श्रेयस अय्यरने जबरदस्त शतके ठोकली. तर सूर्यकुमार यादवनेही तडाखेबंद खेळी केली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर आटोपला.


भारताचे रवीचंद्रन अश्निन आणि रवींद्र जडेजा यांनी घेतलेले प्रत्येकी ३ विकेट तसेच प्रसिद्ध कृष्णाने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडता आला नाही.


भारताने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत नवा रेकॉर्ड निर्माण केला. शुभमन गिलने १०४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. कर्णधार लोकेश राहुलने ५२ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ७२ धावा तडकावल्या.


भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचा फायदा त्यांना नक्कीच आगामी वर्ल्डकपमध्ये होईल.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार