IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मालिका जिंकली, दुसऱ्या सामन्यात ९९ धावांनी विजय

इंदौर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने(india vs australia) डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद ३९९ धावा केल्या होत्या. या सामन्यात शुभमन गिल तसेच श्रेयस अय्यरने जबरदस्त शतके ठोकली. तर सूर्यकुमार यादवनेही तडाखेबंद खेळी केली. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव २१७ धावांवर आटोपला.


भारताचे रवीचंद्रन अश्निन आणि रवींद्र जडेजा यांनी घेतलेले प्रत्येकी ३ विकेट तसेच प्रसिद्ध कृष्णाने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडता आला नाही.


भारताने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत नवा रेकॉर्ड निर्माण केला. शुभमन गिलने १०४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. कर्णधार लोकेश राहुलने ५२ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ७२ धावा तडकावल्या.


भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचा फायदा त्यांना नक्कीच आगामी वर्ल्डकपमध्ये होईल.

Comments
Add Comment

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.