इंदौर: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात रविवारी २४ सप्टेंबरला तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगत आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची नजर इंदोरमधील दुसरी वनडे जिंकत मालिका जिंकण्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघ इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल का? तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४७ वनडे सामने खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने भारताला ८२ वेळा हरवले. तर भारतीय संघाला केवळ ५५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. याशिवाय १० सामन्यांमध्ये कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच अव्वल ठरला आहे. भारतात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ६८ सामने खेळवण्यात आले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३१ वेळा हरवले आहे तर ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाला ३२ सामन्यात हरवले.
भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले. भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने ४८.४ षटकांत ५ विकेट गमावत २८१ धावा केल्या. भारतासाठी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…