IND vs AUS: मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार टीम इंडिया, आज दुसरा सामना

इंदौर: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात रविवारी २४ सप्टेंबरला तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगत आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


टीम इंडियाची नजर इंदोरमधील दुसरी वनडे जिंकत मालिका जिंकण्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघ इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल का? तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.



काय म्हणतात आकडे


आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४७ वनडे सामने खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने भारताला ८२ वेळा हरवले. तर भारतीय संघाला केवळ ५५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. याशिवाय १० सामन्यांमध्ये कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच अव्वल ठरला आहे. भारतात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ६८ सामने खेळवण्यात आले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३१ वेळा हरवले आहे तर ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाला ३२ सामन्यात हरवले.



भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले


भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले. भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने ४८.४ षटकांत ५ विकेट गमावत २८१ धावा केल्या. भारतासाठी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य