IND vs AUS: मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार टीम इंडिया, आज दुसरा सामना

  65

इंदौर: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात रविवारी २४ सप्टेंबरला तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगत आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


टीम इंडियाची नजर इंदोरमधील दुसरी वनडे जिंकत मालिका जिंकण्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघ इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल का? तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.



काय म्हणतात आकडे


आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४७ वनडे सामने खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने भारताला ८२ वेळा हरवले. तर भारतीय संघाला केवळ ५५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. याशिवाय १० सामन्यांमध्ये कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच अव्वल ठरला आहे. भारतात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ६८ सामने खेळवण्यात आले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३१ वेळा हरवले आहे तर ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाला ३२ सामन्यात हरवले.



भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले


भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले. भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने ४८.४ षटकांत ५ विकेट गमावत २८१ धावा केल्या. भारतासाठी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र