IND vs AUS: मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार टीम इंडिया, आज दुसरा सामना

  64

इंदौर: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात रविवारी २४ सप्टेंबरला तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगत आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


टीम इंडियाची नजर इंदोरमधील दुसरी वनडे जिंकत मालिका जिंकण्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघ इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल का? तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.



काय म्हणतात आकडे


आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४७ वनडे सामने खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने भारताला ८२ वेळा हरवले. तर भारतीय संघाला केवळ ५५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. याशिवाय १० सामन्यांमध्ये कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच अव्वल ठरला आहे. भारतात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ६८ सामने खेळवण्यात आले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३१ वेळा हरवले आहे तर ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाला ३२ सामन्यात हरवले.



भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले


भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले. भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने ४८.४ षटकांत ५ विकेट गमावत २८१ धावा केल्या. भारतासाठी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार