का केलं जात लाडक्या गणेशाचं विसर्जन? 

  139

घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते. घरी आलेला, सर्वांचाच लाडका पाहुणा काहींच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जात असतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येते. आपण जाणुन घेऊयात की आपल्या लाडक्या गणेशाचं विसर्जन का करण्यात येते.


काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, गणेशजींनी सलग १० दिवस महाभारत लिहिले होते. एका जागी बसल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते. हे ज्यावेळी व्यास ऋषींनी पाहिले त्यानंतर वेद व्यासजींनी त्यांना एका जलस्त्रोतावर नेले आणि तेथे पाण्यात स्नान केले. त्यामुळे गणेशजींना मोठा आराम मिळाला. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. त्या दिवसापासून या तिथीला गणेशजींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.


पाण्यात का केलं जात विसर्जन?                                                                                                ज्ञान, बुद्धीची देवता, आणि पाणी, हे देखील ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित असल्याचे मानले जाते, याचे कारण स्वतः गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने, भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात. पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले गेले असल्यामुळे, ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली गणेशाची मूर्ती मूळ स्वरूपात पाच तत्वांमध्ये विरघळते आणि विलीन होते.


भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या