2024 T20 World Cup: पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या तारखा जाहीर

  188

नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(icc t-20 world cup 2024)-20 वर्ल्डकपला ४ जूनपासून सुरूवात होत आहे. तर या स्पर्धेचा शेवटचा सामना २० जूनला खेळवला जाणार आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४चे सामने अमेरिकेतील फ्लोरिडा, डल्लास आणि न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणार आहेत. पहिल्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद अमेरिका करत आहे. याआधी नोव्हेंबर २०२१मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला टी-२० वर्ल्डकप २०२४चे यजमानपद मिळाले होते.



भारत-पाकिस्तान सामना कुठे रंगणार?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आयजनहावर पार्कमध्ये होऊ शकतो. हे स्टेडियम न्यूयॉर्क शहरापासून ३० मैलावर आहे. याशिवाय टी-२० वर्ल्डकप २०२३मध्ये एकूण २० संघ खेळणार आहेत. या २० संघांना ५-५ च्या संघांना ४ ग्रुपमध्ये विभागावे लागेल. सर्व ग्रुपच्या टॉप २मध्ये संघ सुपर ८ राऊंडसाठी क्वालिफाय करतील. यानंतर ८ संघांना ४-४ ग्रुपमध्ये विभागावे लागेल. दोन्ही ग्रुपचे टॉप २ संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करतील.



माजी विजेता म्हणून उतरणार इंग्लंड


टी-२० वर्ल्डकप २०२२चे आयोजन ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर झाले होते. या स्पर्धेत इंग्लंडने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला होता. भारतीय संघाचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला होता. इंग्लंडने भारतीय संघाला सेमीफायनल सामन्यात २० विकेटनी हरवले होते. भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २००७चा खिताब जिंकला होता. हा टी-२०मधील पहिलाच वर्ल्डकप होता. यानंतर भारताला एकदाही टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. दरम्यान, यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल