धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

मुंबई: धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाला मिळणारे आरक्षणाचे फायदे देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. आज सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास वर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

आज धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक अतिशय सकारात्मक झाली. काही मुद्दे शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुढे आले. बिहार, झारखंड, तेलंगणा या राज्यात कसे निर्णय घेतले, कशी कार्यपद्धती होती याबाबतीत शिष्टमंडळाने सूचित केले की ही कार्यपद्धती पाहावी.

भारताचे अॅटॉर्नी जनरल यांच्याकडे याबाबतीतला अहवाल पाठवण्याबाबतचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर हायकोर्टात जे प्रकरण सुरू आहे तसेच या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून हवे ते सहकार्य केले जाईल. तसेच आवश्यकतेनुसार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित करण्याची सूचना सरकारकडे आली. त्याबाबतही सरकारने निर्णय घेतलेला आहे. या समितीमध्ये धनगर समाजाच्या एका प्रतिनिधीचा समावेश असणार आहे.

आंदोलनादरम्यान पोलीस केसेसे झाल्या त्या मागे घेण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यावरही सरकारने निर्णय घेतला आहे. त्या मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हे आरक्षण देत असताना इतर समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली. जे लाभ आदिवासी समाजाला मिळत आहेत ते सर्वच्या सर्व अतिशय प्रभावीपणे धनगर समाजाला मिळाले पाहिजेत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

44 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

52 minutes ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

4 hours ago