Team india: वर्ल्डकपपूर्वी मोहम्मद शमीला मोठा दिलासा, न्यायालयाने दिला जामीन

  120

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला २२ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या.


या खेळाडूवर घरगुती हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या खेळाडूला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या खेळाडूच्या पत्नीने केलेल्या हिंसाचार आरोप प्रकरणात जामीन दिला आहे.



न्यायालयात सादर झाला टीम इंडियाचा हा खेळाडू


वनडे वर्ल्डकपआधी भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाताच्या न्यायालयाने त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणात त्याला जामीन मंजूर केला आहे. शमीचा मोठा भाऊ मोहम्मद हसीबला मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.



मोहम्मद शमीवर केले होते गंभीर आरोप


मार्च २०१८मध्ये मोहम्मद शमीच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले होते. आपल्या तक्रारीत तिने शमीवर शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणात शमी आणि त्याचा मोठा भाऊ यांची चौकशी केली होती आणि दोघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता.



Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी