Team india: वर्ल्डकपपूर्वी मोहम्मद शमीला मोठा दिलासा, न्यायालयाने दिला जामीन

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला २२ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या.


या खेळाडूवर घरगुती हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या खेळाडूला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या खेळाडूच्या पत्नीने केलेल्या हिंसाचार आरोप प्रकरणात जामीन दिला आहे.



न्यायालयात सादर झाला टीम इंडियाचा हा खेळाडू


वनडे वर्ल्डकपआधी भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाताच्या न्यायालयाने त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणात त्याला जामीन मंजूर केला आहे. शमीचा मोठा भाऊ मोहम्मद हसीबला मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.



मोहम्मद शमीवर केले होते गंभीर आरोप


मार्च २०१८मध्ये मोहम्मद शमीच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले होते. आपल्या तक्रारीत तिने शमीवर शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणात शमी आणि त्याचा मोठा भाऊ यांची चौकशी केली होती आणि दोघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता.



Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.