एक गाव असंही! गाव जपतयं ४३ वर्षे ही परंपरा...

पालघर तालुक्यातील मनोर विभागात असलेले वरई गाव येथे गेल्या ४३ वर्षांपासूनची 'एक गाव, एक गणपती' ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी १९४६ मध्ये 'श्रीं' ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांच्या साथीदारांनी ओम साई मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज ४३ वर्षे उलटली असून, तेव्हापासून 'एक गाव, एक गणपती' ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.


हे गाव म्हणजे कुणबी, आदिवासी समाजाचे गाव असे ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन पाच दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. गावात प्रथम पूजेचा स्थान जर कोणाला करायचे असेल तर त्यांनी मंडळाला एक महिन्या अगोदर कळवून तो मान मिळवून घेतात, ही परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अजतागायत सुरू आहे.


वरईच्या राजाला यावर्षी जगभरात भारताची मान उंचावणारा चांद्रयान ३ चा देखावा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही देणगी घेत नाही. ज्यांना स्वखुशीने द्यायचे असेल ते मंडळाजवळ जमा करतात. सकाळ - संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती पाच दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते, परिसराची श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री - भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीच्या पाच दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या ४३ वर्षांपासून साई मित्र मंडळ करीत आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून