एक गाव असंही! गाव जपतयं ४३ वर्षे ही परंपरा...

पालघर तालुक्यातील मनोर विभागात असलेले वरई गाव येथे गेल्या ४३ वर्षांपासूनची 'एक गाव, एक गणपती' ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी १९४६ मध्ये 'श्रीं' ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांच्या साथीदारांनी ओम साई मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज ४३ वर्षे उलटली असून, तेव्हापासून 'एक गाव, एक गणपती' ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.


हे गाव म्हणजे कुणबी, आदिवासी समाजाचे गाव असे ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन पाच दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. गावात प्रथम पूजेचा स्थान जर कोणाला करायचे असेल तर त्यांनी मंडळाला एक महिन्या अगोदर कळवून तो मान मिळवून घेतात, ही परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अजतागायत सुरू आहे.


वरईच्या राजाला यावर्षी जगभरात भारताची मान उंचावणारा चांद्रयान ३ चा देखावा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही देणगी घेत नाही. ज्यांना स्वखुशीने द्यायचे असेल ते मंडळाजवळ जमा करतात. सकाळ - संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती पाच दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते, परिसराची श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री - भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीच्या पाच दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या ४३ वर्षांपासून साई मित्र मंडळ करीत आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक