प्रहार    

एक गाव असंही! गाव जपतयं ४३ वर्षे ही परंपरा...

  143

एक गाव असंही! गाव जपतयं ४३ वर्षे ही परंपरा...

पालघर तालुक्यातील मनोर विभागात असलेले वरई गाव येथे गेल्या ४३ वर्षांपासूनची 'एक गाव, एक गणपती' ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी १९४६ मध्ये 'श्रीं' ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांच्या साथीदारांनी ओम साई मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज ४३ वर्षे उलटली असून, तेव्हापासून 'एक गाव, एक गणपती' ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.

हे गाव म्हणजे कुणबी, आदिवासी समाजाचे गाव असे ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन पाच दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. गावात प्रथम पूजेचा स्थान जर कोणाला करायचे असेल तर त्यांनी मंडळाला एक महिन्या अगोदर कळवून तो मान मिळवून घेतात, ही परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अजतागायत सुरू आहे.

वरईच्या राजाला यावर्षी जगभरात भारताची मान उंचावणारा चांद्रयान ३ चा देखावा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही देणगी घेत नाही. ज्यांना स्वखुशीने द्यायचे असेल ते मंडळाजवळ जमा करतात. सकाळ - संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती पाच दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते, परिसराची श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री - भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीच्या पाच दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या ४३ वर्षांपासून साई मित्र मंडळ करीत आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे