Canada India dispute: राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणात सरकारला एकटे सोडणार नाही, काँग्रेसने दिली साथ

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो(canada pm justin trudeau) यांच्याकडून खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्याच्या प्रकरणात केंद्र सरकारला(central government) काँग्रेसची(congress) साथ मिळाली आहे. काँग्रेसने सांगितले की आंतरराष्ट्रीय प्रकरणात देश सर्वात आधी असेले आणि या मुद्द्यावर केंद्राला काँग्रेसचे समर्थन आहे.


दहशतवादी निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय गुप्तचर विभागााचा हात असल्याचा आरोप लगावत कॅनडाने भारताच्या राजदूतांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली आहे.


काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर मंगळवारी लिहिले की देशावर जेव्हा जेव्हा दहशतवादाचा धोका येतो तेव्हा एकजूट कायम राखली गेली पाहिजे अशा मताचे काँग्रेस आहे. विशेष म्हणजे ज्या घटनेवरून भारताचे सार्वभौमत्व, एकता तसेच अखंडतेला धोका असेल त्याप्रकरणात काँग्रेस नेहमीच सरकारच्या बाजूने असेल.



अभिषेक मनू सिंघवी यांनी केले सवाल


काँग्रेसचे आणखी एक खासदार अभिषेक मनू सिंह सिंघवी यांनी कॅनडाचे पंतप्रधान यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले भारतासाठी जितके धोकादायक शत्रू आहेत तितकेच जस्टिन ट्रुडोही आहेत. सिंघवी यांनी ट्रुडो यांची तुलना धरतीवरील ओझे अशी केली आहे.



काय आहे वाद


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आरोप केला आहे की खलिस्तानी दहशतवाही हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणा रॉच्या एजंटचा हात आहे. त्यांचे हे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. तसेच ट्रुडो हे निरर्थक आणि चिथावणीखोर विधान करत असल्याचे भारताने म्हटले आहे. कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलिना जेली यांनी घोषणा केली की एका वरिष्ठ भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नाव पवन कुमार राय आहे. ते रॉचे एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे.

Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा