Accident: कोकणात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला धडक, २० जखमी

रायगड: गणेशोत्सवासाठी(ganeshostav) चाकरमनी मुंबईहून कोकणच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. दरम्यान, यातच एक दुख:द घटना समोर आली आहे. मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला अपघात(bus accident) झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


ही एसटी बस मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असताना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले. विनोद पांडुरंग तागडे या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला.


या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघाताप्रकऱणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.


१ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असतानाही या मार्गावर अवजड वाहने कशी नेली जातात यावरून आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद