Accident: कोकणात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला धडक, २० जखमी

रायगड: गणेशोत्सवासाठी(ganeshostav) चाकरमनी मुंबईहून कोकणच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. दरम्यान, यातच एक दुख:द घटना समोर आली आहे. मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला अपघात(bus accident) झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


ही एसटी बस मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असताना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले. विनोद पांडुरंग तागडे या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला.


या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघाताप्रकऱणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.


१ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असतानाही या मार्गावर अवजड वाहने कशी नेली जातात यावरून आता सवाल केले जात आहेत.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह