रायगड: गणेशोत्सवासाठी(ganeshostav) चाकरमनी मुंबईहून कोकणच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. दरम्यान, यातच एक दुख:द घटना समोर आली आहे. मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला अपघात(bus accident) झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही एसटी बस मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असताना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले. विनोद पांडुरंग तागडे या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला.
या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघाताप्रकऱणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
१ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असतानाही या मार्गावर अवजड वाहने कशी नेली जातात यावरून आता सवाल केले जात आहेत.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…