Supreme court hearings : गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी तीन मोठ्या घडामोडी

१८ सप्टेंबरला काय होणार?


मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने (Central government) विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ सप्टेंबर म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सुरु होणार आहे. पण याच दिवशी राज्याच्या दृष्टीने आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या केसेसची सुनावणी पार पडणार आहे. या तीन घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे.


निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवाय विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीला उशीर करत आहेत, याबद्दल देखील ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे. निवडणूक आयोगाने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. हा निकाल चुकीचा ठरवत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्ट काय निकाल देतं, हे पाहावं लागेल. शिवाय १६ आमदारांच्या अपात्रतेचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आता आणखी लांबणीवर गेल्याने सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर काय टिपण्णी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध