Supreme court hearings : गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी तीन मोठ्या घडामोडी

१८ सप्टेंबरला काय होणार?


मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने (Central government) विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ सप्टेंबर म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सुरु होणार आहे. पण याच दिवशी राज्याच्या दृष्टीने आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या केसेसची सुनावणी पार पडणार आहे. या तीन घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे.


निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवाय विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीला उशीर करत आहेत, याबद्दल देखील ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे. निवडणूक आयोगाने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. हा निकाल चुकीचा ठरवत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्ट काय निकाल देतं, हे पाहावं लागेल. शिवाय १६ आमदारांच्या अपात्रतेचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आता आणखी लांबणीवर गेल्याने सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर काय टिपण्णी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि