Supreme court hearings : गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी तीन मोठ्या घडामोडी

  163

१८ सप्टेंबरला काय होणार?


मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने (Central government) विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ सप्टेंबर म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सुरु होणार आहे. पण याच दिवशी राज्याच्या दृष्टीने आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या केसेसची सुनावणी पार पडणार आहे. या तीन घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे.


निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवाय विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीला उशीर करत आहेत, याबद्दल देखील ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे. निवडणूक आयोगाने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. हा निकाल चुकीचा ठरवत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्ट काय निकाल देतं, हे पाहावं लागेल. शिवाय १६ आमदारांच्या अपात्रतेचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आता आणखी लांबणीवर गेल्याने सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर काय टिपण्णी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे