Eknath shinde : अडीच वर्षे वाया गेली पण आता विकास होणार; गुंतवणुकीतही महाराष्ट्र एक नंबरवर आणणार

छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार


औरंगाबाद : आज मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. दरम्यान, या बैठकीच्या आधी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सरकारच्या विकासकामांबाबत आढावा घेताना मागच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षांच्या काळात पायाभूत सुविधांच्या विकास ठप्प झाला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र एक नंबरवर होता. मात्र मधल्या काळात तो मागे पडला. आता पुन्हा तो १ नंबरवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं ते म्हणाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचं मध्यवर्ती शहर म्हणून आता औरंगाबाद म्हणायचं नाही, तर संभाजीनगर शहर म्हणायचं अशी सूचनादेखील केली.


पुढे शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिले आहे. २ हजार ७०० कोटींची पाणीयोजना दिली. रस्त्यांना ५०० कोटी दिले. आज मंत्रिमंडळ विशेष बैठक होणार असून, मराठवाड्यासाठी याचा फायदा होईल. मराठवाड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी वॉटरग्रीड योजनेचा ठराव केला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये संमती दिली होती. त्यानुसार जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली. आता त्याचा दुसरा टप्पा ही सुरु झाला पाहिजे. सरकार गेल्यानंतर मागच्या सरकारमध्ये दुर्दैवाने ते ठप्प झाल्याची टीकाही शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.



संतांची भूमी असलेल्या ठिकाणाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व प्राप्त होईल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र सरकार देखील भक्कमपणे आपल्या पाठिशी आहे. राज्याचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले की, केंद्र सरकार लगेच निधी देण्याचं काम करतं. मागच्या बजेटमध्ये देखील महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने मोठी तरतूद केली होती. सिंचन प्रकल्प, शेतपिकात बदल, कोल्डस्टोरेज यासारखे अनेक निर्णय आपण घेत आहोत. संतांची भूमी असलेल्या या ठिकाणाला आपण प्राधान्य देत आहोत. भविष्यात या भूमीला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व प्राप्त होईल. स्वामी रामानंद तीर्थ यांचं दिल्लीत स्मारक असलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले त्यावर आपण नक्कीच निर्णय घेऊ. कृषी विद्यापीठांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. कृषी संशोधक यांनी शेतकरी यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद