Eknath shinde : अडीच वर्षे वाया गेली पण आता विकास होणार; गुंतवणुकीतही महाराष्ट्र एक नंबरवर आणणार

  284

छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार


औरंगाबाद : आज मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. दरम्यान, या बैठकीच्या आधी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सरकारच्या विकासकामांबाबत आढावा घेताना मागच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षांच्या काळात पायाभूत सुविधांच्या विकास ठप्प झाला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र एक नंबरवर होता. मात्र मधल्या काळात तो मागे पडला. आता पुन्हा तो १ नंबरवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं ते म्हणाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचं मध्यवर्ती शहर म्हणून आता औरंगाबाद म्हणायचं नाही, तर संभाजीनगर शहर म्हणायचं अशी सूचनादेखील केली.


पुढे शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिले आहे. २ हजार ७०० कोटींची पाणीयोजना दिली. रस्त्यांना ५०० कोटी दिले. आज मंत्रिमंडळ विशेष बैठक होणार असून, मराठवाड्यासाठी याचा फायदा होईल. मराठवाड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी वॉटरग्रीड योजनेचा ठराव केला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये संमती दिली होती. त्यानुसार जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली. आता त्याचा दुसरा टप्पा ही सुरु झाला पाहिजे. सरकार गेल्यानंतर मागच्या सरकारमध्ये दुर्दैवाने ते ठप्प झाल्याची टीकाही शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.



संतांची भूमी असलेल्या ठिकाणाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व प्राप्त होईल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र सरकार देखील भक्कमपणे आपल्या पाठिशी आहे. राज्याचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले की, केंद्र सरकार लगेच निधी देण्याचं काम करतं. मागच्या बजेटमध्ये देखील महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने मोठी तरतूद केली होती. सिंचन प्रकल्प, शेतपिकात बदल, कोल्डस्टोरेज यासारखे अनेक निर्णय आपण घेत आहोत. संतांची भूमी असलेल्या या ठिकाणाला आपण प्राधान्य देत आहोत. भविष्यात या भूमीला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व प्राप्त होईल. स्वामी रामानंद तीर्थ यांचं दिल्लीत स्मारक असलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले त्यावर आपण नक्कीच निर्णय घेऊ. कृषी विद्यापीठांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. कृषी संशोधक यांनी शेतकरी यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील