मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या (ED) कामांनाही वेग आला आहे. निवडणुकीआधी सगळ्यांची पोलखोल करुन योग्य नेते जनतेसमोर ठेवायचे असं जणू ईडीने ठरवलंच आहे. त्यामुळेच ठाकरे गटाला (Thackeray group) निवडणुकीसाठी महत्त्वाचे असणारे एकेक नेते ईडीच्या कचाट्यात सापडत आहेत. मविआच्या काळात केलेल्या भ्रष्टाचाराची वेगाने चौकशी सुरु असून ईडी गुन्हे दाखल करण्याचा सपाटाच लावला आहे.
कोविडकाळात बॉडीबॅग्ज वाढीव किमतीने विकल्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल आहेच, मात्र आता ठाकरे गटाचे अत्यंत महत्त्वाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर देखील ईडीने गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र वायकरांसह त्यांची पत्नी आणि इतर अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुका जवळ आलेल्या असताना ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जोगेश्वरीमधील (Jogeshwari) सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर करण्यात आला आहे. बीएमसीचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर, मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं आहे व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप सोमय्यांनी केला होता. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…