Nipah Virus : निपाह व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केरळसह तामिळनाडू, कर्नाटकने जारी केला अलर्ट

केरळ : कोरोना महामारीमधून सावरत असतानाच आता केरळमध्ये निपाह व्हायरसच्या (Nipah Virus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. निपाह व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केरळसह तामिळनाडू, कर्नाटकने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केला आहे.


केरळमध्ये निपाह व्हायरसची वाढती रुग्णसंख्या पाहता, तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. लोकांना केरळच्या ज्या भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. त्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.



कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये (कोडागू, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि म्हैसूर) आणि केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीतही वाढ करण्यात आली आहे.


केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, निपाह व्हायरस एक झुनोटिक व्हायरस आहे. म्हणजे प्राण्यांच्या माध्यमातून तो माणसात पसरतो. काहीवेळा तो खाण्यापिण्याद्वारे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो.


मलेशियातील सुंगाई निपाह या गावात १९९९ मध्ये निपाहची पहिली घटना समोर आली होती. त्यामुळे या विषाणूला निपाह असे नाव देण्यात आले आहे. हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. त्याचबरोबर डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि शक्यतो मेंढ्यांमधून देखील हा विषाणू पसरू शकतो.


जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर तो इतरांनाही संक्रमित करू शकतो. निपाह व्हायरस कमी संसर्गजन्य परंतु अधिक प्राणघातक मानला जातो. याचा अर्थ असा की कमी लोकांना याची लागण होऊ शकते, परंतु मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये जेव्हा निपाह विषाणूचा प्रसार झाला तेव्हा त्याचा मृत्यूदर ४५ ते ७० टक्के होता.


एवढेच नाही तर निपाह व्हायरसमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होऊ शकते. अशा परिस्थितीत निपाह बाधित व्यक्तीचे अंतिम संस्कार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


जर एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली तर त्याला जास्त ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणे दिसतात.


त्याच वेळी, परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती २४ ते ४८ तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते, इतका हा आजार गंभीर आहे. यामुळे केरळसह शेजारील राज्यांनी अलर्ट जारी केला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट