Nipah Virus: कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेज १७ सप्टेंबरपर्यंत बंद

कोझिकोड: केरळ सरकारने निपाह व्हायरसचा (nipah virus) प्रसार रोखण्यासाठी कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेजमधील सुट्टी १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दोन दिवस आधीच राज्यात या घातक व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून कोझिकोड जिल्ह्यात आंगणवाडी, मदरशे, क्लासेस तसेच प्रोफेशनल कॉलेजसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


यातच राज्य सरकारने म्हटले की, निपाह व्हायरसचे संक्रमण झालेल्या लोकांच्या उपचारासाठी गरजेचे मोनोक्लोनल अँटीबॉडी राज्यात पोहोचली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्यात बैठक झाली होती आणि आता मोनोक्लोन अँटीबॉडी आली आहे.



निपाह व्हायरसला घाबरण्याची गरज नाही


मंत्र्यांनी याआधी राज्यात विधानसभेत म्हटले होते की लोकांनी कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या प्रकोपाबद्दल घाबरण्याची गरज नाही. मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत सावधानता बाळगली पाहिजे. त्यांनी विधानसभेत विधान केले की घाबरण्याची गरज नाही. सर्वांनी मिळून सावधानतेने याचा सामना करूया.



कोझिकोडमध्ये निपाहमुळे दोघांचा मृत्यू


निपाह व्हायरसमुळे कोझिकोडमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जणांना व्हायरसची लागण झाली आहे. राज्यात बुधवारी २४ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला या व्हायरसची लागण झाली. केरळमधील हे पाचवे प्रकरण आहे. तीन जणांवर उपचार सुरू आहेत. यात नऊ वर्षाच्या मुलाची स्थिती गंभीर आहे.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य