Chitra Wagh : जेलमध्ये राहिल्यामुळे राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय!

ज्यांनी मराठा आरक्षण दिलंच नाही, त्यांनी वल्गना करु नये


चित्रा वाघ यांचे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर बोचरे वार


गोंदिया : सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडू नये याकरता काहीही बरळणाऱ्या ठाकरे गटाच्या संजय राऊतांचे (Sanjay Raut) भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी वाभाडे काढले. 'सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करु' असं विधान करत संजय राऊतांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. यावर चित्रा वाघ यांनीदेखील तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


"संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात," असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. 'मेरी माटी मेरा देश' (Meri Mati Mera Desh) या अभियानासाठी गोंदिया जिल्ह्यात आल्या असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांचे चेहऱ्यावर स्माईल आणणारं सरकार आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही टोला लगावला आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, या राज्यावर ४० वर्षे मराठा नेते राज्य करत होते. मराठ्यांना कोणी आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्या अडीच वर्षात हायकोर्टात हे आरक्षण टिकवू शकलेले नाहीत, ज्यांनी कधी दिलंच नाही त्यांनी अशा वल्गना करु नये, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.


काही दिवसांपूर्वीच चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचे उत्तर म्हणून जोकरचे कपडे पाठवले होते. एखाद्या नेत्याच्या शरीरावरुन टीका करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे नेत्यांच्या टिवल्या-बावल्या करतात आणि महाराष्ट्रात लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे जोकर करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे आम्ही पाठवले, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा