Chitra Wagh : जेलमध्ये राहिल्यामुळे राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय!

ज्यांनी मराठा आरक्षण दिलंच नाही, त्यांनी वल्गना करु नये


चित्रा वाघ यांचे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर बोचरे वार


गोंदिया : सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडू नये याकरता काहीही बरळणाऱ्या ठाकरे गटाच्या संजय राऊतांचे (Sanjay Raut) भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी वाभाडे काढले. 'सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करु' असं विधान करत संजय राऊतांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. यावर चित्रा वाघ यांनीदेखील तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


"संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात," असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. 'मेरी माटी मेरा देश' (Meri Mati Mera Desh) या अभियानासाठी गोंदिया जिल्ह्यात आल्या असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांचे चेहऱ्यावर स्माईल आणणारं सरकार आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही टोला लगावला आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, या राज्यावर ४० वर्षे मराठा नेते राज्य करत होते. मराठ्यांना कोणी आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्या अडीच वर्षात हायकोर्टात हे आरक्षण टिकवू शकलेले नाहीत, ज्यांनी कधी दिलंच नाही त्यांनी अशा वल्गना करु नये, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.


काही दिवसांपूर्वीच चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचे उत्तर म्हणून जोकरचे कपडे पाठवले होते. एखाद्या नेत्याच्या शरीरावरुन टीका करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे नेत्यांच्या टिवल्या-बावल्या करतात आणि महाराष्ट्रात लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे जोकर करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे आम्ही पाठवले, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य