Wheat Price: गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचे पाऊल

नवी दिल्ली : गहूचे दर सातत्याने वाढत आहे. विधानसभा निवडणुकीआधी गव्हाच्या किंमतीमध्ये उसळी आल्यानंतर सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. किंमतीमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने गव्हाची स्टॉक लिमिट ३ हजाराहून घटवून २ हजार टन करण्याची घोषणा केली आहे. सरकारचा हा निर्णय तातडीने लागू होणार आहे.


या निर्णयाची घोषणा करताना खाद्य सचिव संजीव चोपडा म्हणाले, सध्याचे वाढते दर पाहता आम्ही स्टॉकचे समीक्षण केले आणि आज १४ सप्टेंबर २०२३ पासून व्यापारी, घाऊक विक्रेता आणि मोठ्या चेन रिटेलर्ससाठी स्टॉक लिमिटची सीमा घटवून २ हजार टन केली आहे. याआधी १२ जून २०२३ला सरकारने गहू व्यापाऱ्यांना मार्च २०२४ पर्यंत ३ हजार टन गहू स्टॉक करण्याची परवानगी दिली होती. ती आता घटवून २ हजार टन केली आहे.


गेल्या एका महिन्यात वायदा बाजारात गहूच्या किंमतीमध्ये चार टक्के उसळी पाहायला मिळाली. गव्हाचे दर वाढू २५५० रूपये प्रति क्विंटल झाले आहे. खाद्य सचिव म्हणाले देशांत गव्हची पुरेशी उपलब्धता आहे मात्र असे वाटत आहे की काही लोक आर्टिफिशियल पद्धतीने गव्हाची कमतरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे