Wheat Price: गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचे पाऊल

नवी दिल्ली : गहूचे दर सातत्याने वाढत आहे. विधानसभा निवडणुकीआधी गव्हाच्या किंमतीमध्ये उसळी आल्यानंतर सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. किंमतीमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने गव्हाची स्टॉक लिमिट ३ हजाराहून घटवून २ हजार टन करण्याची घोषणा केली आहे. सरकारचा हा निर्णय तातडीने लागू होणार आहे.


या निर्णयाची घोषणा करताना खाद्य सचिव संजीव चोपडा म्हणाले, सध्याचे वाढते दर पाहता आम्ही स्टॉकचे समीक्षण केले आणि आज १४ सप्टेंबर २०२३ पासून व्यापारी, घाऊक विक्रेता आणि मोठ्या चेन रिटेलर्ससाठी स्टॉक लिमिटची सीमा घटवून २ हजार टन केली आहे. याआधी १२ जून २०२३ला सरकारने गहू व्यापाऱ्यांना मार्च २०२४ पर्यंत ३ हजार टन गहू स्टॉक करण्याची परवानगी दिली होती. ती आता घटवून २ हजार टन केली आहे.


गेल्या एका महिन्यात वायदा बाजारात गहूच्या किंमतीमध्ये चार टक्के उसळी पाहायला मिळाली. गव्हाचे दर वाढू २५५० रूपये प्रति क्विंटल झाले आहे. खाद्य सचिव म्हणाले देशांत गव्हची पुरेशी उपलब्धता आहे मात्र असे वाटत आहे की काही लोक आर्टिफिशियल पद्धतीने गव्हाची कमतरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे