Parliment session: मोदी सरकारकडून ससंदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर, ही ४ विधेयके होणार सादर

नवी दिल्ली : मोदी सरकारडून येत्या १८ सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन (parliment special session) बोलावले आहे. दरम्यान, हे विशेष अधिवेशन का घेतले जाणार आहे याचा अजेंडा मोदी सरकारने स्पष्ट केला आहे. या विशेष अधिवेशनात ४ विधेयके सादर केली जाणार आहे.


या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा केली जाणार आहे. तसेच या अधिवेशनादरम्यान सरकारकडून चार महत्त्वाची विधेयके सादर केली जातील. यात अधिवक्ता (सुधारणा) विधेयक २०२३ आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक २०२३ यांचा समावेश आहे. ही विधेयके लोकसभेत सादर केली जातील. याआधी ३ ऑगस्टला ही विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आली होती.


तसेच या अधिवेशनादरम्यान पोस्ट ऑफिस विधेयक २०२३, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक २०२३ यावरही चर्चा होणार आहे. १० ऑगस्टला ही विधेयक राज्यसभेत मांडली गेली होती.


खरंतर मोदी सरकारकडून बोलावण्यात आलेल्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावरून विरोधी पक्ष सातत्याने सवाल करत आहे. काँग्रेसकडून सरकारवर वारंवार निशाणा साधला जात होता. सरकारने अजेंडा जाहीर करावा अशी विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र आता मोदी सरकारने याबाबतचा प्रस्तावित अजेंडा जाहीर केला आहे. या विशेष अधिवेशनादरम्यान सरकार एक देश एक निवडणूक आणि देशाचे नाव इंडिया बदलून भारत करण्याबाबतचा प्रस्ताव आणू शकते अशी चर्चा रंगली होती. मात्र सरकारने स्पष्ट केलेल्या अजेंड्यामध्ये याचा उल्लेख नाही.

Comments
Add Comment

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)