Parliment session: मोदी सरकारकडून ससंदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर, ही ४ विधेयके होणार सादर

नवी दिल्ली : मोदी सरकारडून येत्या १८ सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन (parliment special session) बोलावले आहे. दरम्यान, हे विशेष अधिवेशन का घेतले जाणार आहे याचा अजेंडा मोदी सरकारने स्पष्ट केला आहे. या विशेष अधिवेशनात ४ विधेयके सादर केली जाणार आहे.


या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा केली जाणार आहे. तसेच या अधिवेशनादरम्यान सरकारकडून चार महत्त्वाची विधेयके सादर केली जातील. यात अधिवक्ता (सुधारणा) विधेयक २०२३ आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक २०२३ यांचा समावेश आहे. ही विधेयके लोकसभेत सादर केली जातील. याआधी ३ ऑगस्टला ही विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आली होती.


तसेच या अधिवेशनादरम्यान पोस्ट ऑफिस विधेयक २०२३, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक २०२३ यावरही चर्चा होणार आहे. १० ऑगस्टला ही विधेयक राज्यसभेत मांडली गेली होती.


खरंतर मोदी सरकारकडून बोलावण्यात आलेल्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावरून विरोधी पक्ष सातत्याने सवाल करत आहे. काँग्रेसकडून सरकारवर वारंवार निशाणा साधला जात होता. सरकारने अजेंडा जाहीर करावा अशी विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र आता मोदी सरकारने याबाबतचा प्रस्तावित अजेंडा जाहीर केला आहे. या विशेष अधिवेशनादरम्यान सरकार एक देश एक निवडणूक आणि देशाचे नाव इंडिया बदलून भारत करण्याबाबतचा प्रस्ताव आणू शकते अशी चर्चा रंगली होती. मात्र सरकारने स्पष्ट केलेल्या अजेंड्यामध्ये याचा उल्लेख नाही.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी