राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार;

  168

मुंबई: संपूर्ण ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस(monsoon) सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात परतला आहे. राज्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र बळीराजा पाऊस होत नसल्याने चिंतेत आहे. पिके जगवण्यासाठी पावसाची गरज आहे. हवामान खात्याने आज राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे . मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोबत मुंबई आणि कोकण परिसरातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


यंदा जुलैमध्ये प्रचंड पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिना अक्षऱश: कोरडा गेला. गेल्या १०० वर्षांत असे कधी घडले नव्हते की ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी अद्याप हवा तितका पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे.


राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. अनेक जिल्हे दुष्काळाच्या स्थितीत अडकले आहेत. पिके करपून जात आहेत. पाणीसाठ्यातही घट होऊ लागली आहे. अनेक नद्या अक्षरश: कोरड्याठाक पडल्या आहेत.


दरम्यान, एल निनोचा परिणाम भारतातील हवामानावर झाल्याने त्याचा फटका पावसाला बसला. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.