राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार;

मुंबई: संपूर्ण ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस(monsoon) सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात परतला आहे. राज्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र बळीराजा पाऊस होत नसल्याने चिंतेत आहे. पिके जगवण्यासाठी पावसाची गरज आहे. हवामान खात्याने आज राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे . मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोबत मुंबई आणि कोकण परिसरातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


यंदा जुलैमध्ये प्रचंड पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिना अक्षऱश: कोरडा गेला. गेल्या १०० वर्षांत असे कधी घडले नव्हते की ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी अद्याप हवा तितका पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे.


राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. अनेक जिल्हे दुष्काळाच्या स्थितीत अडकले आहेत. पिके करपून जात आहेत. पाणीसाठ्यातही घट होऊ लागली आहे. अनेक नद्या अक्षरश: कोरड्याठाक पडल्या आहेत.


दरम्यान, एल निनोचा परिणाम भारतातील हवामानावर झाल्याने त्याचा फटका पावसाला बसला. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,