Alphabet : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नवी दिल्ली : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. यावेळेस शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. टेक दिग्गज कंपनीने ग्लोबल रिक्युमेंट टीममधून कर्मचाऱ्यांना काढसे आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार काही शेकडो पदे समाप्त करण्याचा निर्णय व्यापक प्रमाणात घेतलेल्या कपातीचा भाग नाही आणि महत्त्वाच्या भूमिकांसाठी टीमची संख्या कायम ठेवली जाईल.


नव्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची कपात करणारी ही पहिली बिग टेक कंपनी आहे. विशेष म्हणजे २०२३ वर्षाच्या सुरूवातीला मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या संख्येने नोकरीत कपात केली होती.



अल्फाबेटने आधीही केली आहे कपात


गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जानेवारीमध्ये भरती आणि इंजीनियरिंग सह टीममध्ये साधारण १२ हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली होती. कर्मचाऱ्यांची ही कपात जगभरात करण्यात आली होती. हा आकडा एकूण वर्कफोर्सच्या ६ टक्के इतका आहे. अॅमेझॉनकडून १८ हजार नोकरी कपातीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर काही आठवड्याने मायक्रोसॉफ्टनेही १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.



चार पटीने कपात वाढली


अमेरिकासह जागतिक स्तरावर कपातीचे सत्र कायम आहे. दिग्गज कंपन्यांसह स्टार्टअप्सनेही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू