Alphabet : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नवी दिल्ली : गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. यावेळेस शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. टेक दिग्गज कंपनीने ग्लोबल रिक्युमेंट टीममधून कर्मचाऱ्यांना काढसे आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार काही शेकडो पदे समाप्त करण्याचा निर्णय व्यापक प्रमाणात घेतलेल्या कपातीचा भाग नाही आणि महत्त्वाच्या भूमिकांसाठी टीमची संख्या कायम ठेवली जाईल.


नव्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची कपात करणारी ही पहिली बिग टेक कंपनी आहे. विशेष म्हणजे २०२३ वर्षाच्या सुरूवातीला मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या संख्येने नोकरीत कपात केली होती.



अल्फाबेटने आधीही केली आहे कपात


गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जानेवारीमध्ये भरती आणि इंजीनियरिंग सह टीममध्ये साधारण १२ हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली होती. कर्मचाऱ्यांची ही कपात जगभरात करण्यात आली होती. हा आकडा एकूण वर्कफोर्सच्या ६ टक्के इतका आहे. अॅमेझॉनकडून १८ हजार नोकरी कपातीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर काही आठवड्याने मायक्रोसॉफ्टनेही १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.



चार पटीने कपात वाढली


अमेरिकासह जागतिक स्तरावर कपातीचे सत्र कायम आहे. दिग्गज कंपन्यांसह स्टार्टअप्सनेही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा