Asia cup: आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का

कोलंबो: फलंदाज बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पाकिस्तानी संघाला आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) मोठा झटका बसला आहे. संघाचा सुपरस्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पाकिस्तानला आशिया चषकमध्ये सुपर ४मध्ये आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे.



स्पर्धेबाहेर गेला हा क्रिकेटर


पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर नसीम शाह दुखापतीमुळे आशिया चषकातील बाकी सामन्यातून बाहेर गेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे की वेगवान गोलंदाज नसी शाहच्या जागी जमान खानला आशिया चषकात सामील केले जाईल. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सुपर ४मधील सामन्यात नसीमच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर मेडिकल टीम लक्ष देऊन आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप लक्षात घेता सर्व आवश्यक सावधानता बाळगली जात आहे.



रिप्लेसमेंटची घोषणा


आशिया चषक संघात नसीम शाहच्या जागी २२ वर्षीय जमान खानला सामील केले आहे. वेगवान गोलंदाज जमान खानने टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तानसाठी त्याने ६ टी-२० सामन्यात त्याने ३२.५०च्या सरासरीने ६.६६च्या इकॉनॉमीने ४ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी