Asia cup: आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का

  103

कोलंबो: फलंदाज बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पाकिस्तानी संघाला आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) मोठा झटका बसला आहे. संघाचा सुपरस्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पाकिस्तानला आशिया चषकमध्ये सुपर ४मध्ये आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे.



स्पर्धेबाहेर गेला हा क्रिकेटर


पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर नसीम शाह दुखापतीमुळे आशिया चषकातील बाकी सामन्यातून बाहेर गेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे की वेगवान गोलंदाज नसी शाहच्या जागी जमान खानला आशिया चषकात सामील केले जाईल. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सुपर ४मधील सामन्यात नसीमच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर मेडिकल टीम लक्ष देऊन आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप लक्षात घेता सर्व आवश्यक सावधानता बाळगली जात आहे.



रिप्लेसमेंटची घोषणा


आशिया चषक संघात नसीम शाहच्या जागी २२ वर्षीय जमान खानला सामील केले आहे. वेगवान गोलंदाज जमान खानने टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तानसाठी त्याने ६ टी-२० सामन्यात त्याने ३२.५०च्या सरासरीने ६.६६च्या इकॉनॉमीने ४ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला