विमानात बिघाड झाल्याने भारताने ट्रुडो यांना ऑफर केले होते मोदींचे विमान, मात्र...

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेत (g-20 summit) सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो अखेर ३६ तासांच्या प्रतीक्षेनंतर मायदेशी परतले आहेत. त्यांना रविवारी कॅनडात परतायचे होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवस त्यांना भारतातच थांबावे लागले.


सरकारशी संबंधित सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने ट्रुडो आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाला कॅनडामध्ये परतण्यासाठी एअर इंडिया वन विमानाची ऑफर देण्यात आली होती. मात्र कॅनडाने भारत सरकारची ही ऑफर धुडकावून लावली. भारत सरकारच्या या प्रस्तावाच्या सहा तासानंतर कॅनडा सरकारने सांगितले की ते कॅनडामधून आपले विमान येण्याची प्रतीक्षा करतील.


एअर इंडिया वन बोईंग ७७७ हे विमान आहे ज्याचा वापर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेशी दौऱ्यांसाठी करत असतात.


जी-२० परिषदेत भाग घेतल्यानंतर ट्रुडो रविवारी मायदेशी परतणार होते. मात्र उड्डाणाआधी तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. यानंतर कॅनडाच्या सुरक्षा एजन्सीनी विमान एअरबस CFC001ला उड्डाणापासून रोखले होते.


यानंतर कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की जस्टिन ट्रुडो आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळाला भारतातून आणण्यासाठी एक बॅकअप विमान CFC002 येत आहे. दरम्यान, बॅकअप विमान आले नाही. ते विमान दुरुस्त झाल्यानंतर दुपारी १ वाजता रवाना झाले होते.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात