विमानात बिघाड झाल्याने भारताने ट्रुडो यांना ऑफर केले होते मोदींचे विमान, मात्र...

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेत (g-20 summit) सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो अखेर ३६ तासांच्या प्रतीक्षेनंतर मायदेशी परतले आहेत. त्यांना रविवारी कॅनडात परतायचे होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवस त्यांना भारतातच थांबावे लागले.


सरकारशी संबंधित सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने ट्रुडो आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाला कॅनडामध्ये परतण्यासाठी एअर इंडिया वन विमानाची ऑफर देण्यात आली होती. मात्र कॅनडाने भारत सरकारची ही ऑफर धुडकावून लावली. भारत सरकारच्या या प्रस्तावाच्या सहा तासानंतर कॅनडा सरकारने सांगितले की ते कॅनडामधून आपले विमान येण्याची प्रतीक्षा करतील.


एअर इंडिया वन बोईंग ७७७ हे विमान आहे ज्याचा वापर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेशी दौऱ्यांसाठी करत असतात.


जी-२० परिषदेत भाग घेतल्यानंतर ट्रुडो रविवारी मायदेशी परतणार होते. मात्र उड्डाणाआधी तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. यानंतर कॅनडाच्या सुरक्षा एजन्सीनी विमान एअरबस CFC001ला उड्डाणापासून रोखले होते.


यानंतर कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की जस्टिन ट्रुडो आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळाला भारतातून आणण्यासाठी एक बॅकअप विमान CFC002 येत आहे. दरम्यान, बॅकअप विमान आले नाही. ते विमान दुरुस्त झाल्यानंतर दुपारी १ वाजता रवाना झाले होते.

Comments
Add Comment

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही