INDIA : इंडिया आघाडीत पुन्हा वाद? हरयाणामध्ये आपची एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

नवी दिल्ली : इंडिया (india) आघाडीत पुन्हा वाद निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहेत. असे यासाठी कारण आम आदमी पक्षाने हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची घोषणा केली आहे. आपचे संघटन महासचिव संदीप पाठक यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक एकट्यानेच लढणार आहे आणि ते अन्य कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत.


संदीप पाठक म्हणाले, हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका येत आहे आणि आम आदमी पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे. सर्व राज्यांमध्ये आम्ही संघटना निर्माण करत आहोत. हरयाणामध्ये सर्कल लेव्हलपर्यंत आमचे संघटन बनले आहे. १५ दिवसांत हरयाणाच्या एक एक गावांत आमची कमिटी बनणार आहे. त्यानंतर आम्ही आमचे कँपेन सुरू करू. हरयाणाच्या जनतेला बदल हवा आहे.


१३ सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या कॉर्डिनेशन कमिटीच्या बैठकीबाबत संदीप पाठक म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत जी पार्टनरशिप झाली त्याच्याशी संबंधित मीटिंग उद्या आहे. सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. काय अजेंडा असणार आहे याची आयडिया नाही मात्र उमेदवार निवडीपासून ते कँपेन प्लानिंग यावर चर्चा होईल.


सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा लवकर सोडवण्याबाबत सहमती झाली.

Comments
Add Comment

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी