कोलंबो : कोलंबो येथे काल भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील आशिया कपचा (Asia Cup 2023) सामना उत्तम रंगत आणत होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असली तरी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत भारतीय संघाने जोरदार फलंदाजी केली. मात्र २४ व्या षटकातच पावसाने मोडता घातला आणि सामना थांबवावा लागला. हा सामना आज दुपारी ३ वाजता खेळवला जाणार होता. मात्र, तोपर्यंत पाऊस थांबला नाही. आता हळूहळू सूर्यनारायणाचे दर्शन मिळाल्याने ५ वाजता सामना खेळवण्याचे ठरले आहे. मात्र, आता त्यात काही व्यत्यय आले आणि सामना होऊ शकला नाही तर ते भारतीय संघाला चांगलंच महागात पडणार आहे.
पाकिस्तान संघाने सुपर ४ मधील पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाने भारताविरुद्धचा हा सामना जिंकल्यास त्याचे चार गुण होतील आणि अंतिम फेरीतील त्याचे स्थान जवळपास निश्चित होईल. त्याचप्रमाणे भारताने हा सामना जिंकल्यास भारताचे दोन गुण होतील आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा त्याचा दावा बळकट होईल. मात्र, सामना रद्द झाला तर परिस्थिती वेगळी असेल जी भारतासाठी धोकादायक मात्र पाकिस्तानसाठी फायदेशीर आहे.
सुपर ४ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. त्यामुळे पाकिस्तान संघाकडे तीन गुण होतील. तर भारताचा हा पहिलाच सामना असल्यामुळे फक्त एक गुण असेल. भारताला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १४ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. पावसाने सामना वाया गेल्यास टीम इंडियाला एक गुण मिळेल आणि अशा परिस्थितीत त्याचा मार्ग कठीण होईल. या स्थितीत त्यांना त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील, कारण श्रीलंकेने यापूर्वीच एक सामना जिंकला आहे. जर संघ हरला तर त्याचे पुढील दोन सुपर फोर सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असतील.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…