G-20 Summit : पंतप्रधान मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई: भारताची राजधानी नवी दिल्लीत नुकतीच जी-२० शिखर परिषद(g-20 summit) अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या परिषदेसाठी जगभरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताने या परिषदेचे यशस्वीपणे यजमानपद सांभाळले.


दोन दिवसांच्या या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील नेत्यांनी चर्चा केली. तसेच या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष एकत्र आले होते. याद्वारे पंतप्रधान मोदींनी जग जिंकले असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच नवी दिल्लीतील या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.


 


तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास वेगाने होत असून अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचा अनुभव परिषदेत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता

BMC News : प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश मुंबई : मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण