G-20 Summit : पंतप्रधान मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई: भारताची राजधानी नवी दिल्लीत नुकतीच जी-२० शिखर परिषद(g-20 summit) अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या परिषदेसाठी जगभरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताने या परिषदेचे यशस्वीपणे यजमानपद सांभाळले.


दोन दिवसांच्या या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील नेत्यांनी चर्चा केली. तसेच या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष एकत्र आले होते. याद्वारे पंतप्रधान मोदींनी जग जिंकले असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच नवी दिल्लीतील या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.


 


तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास वेगाने होत असून अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचा अनुभव परिषदेत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास