G-20 Summit : पंतप्रधान मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई: भारताची राजधानी नवी दिल्लीत नुकतीच जी-२० शिखर परिषद(g-20 summit) अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या परिषदेसाठी जगभरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताने या परिषदेचे यशस्वीपणे यजमानपद सांभाळले.


दोन दिवसांच्या या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील नेत्यांनी चर्चा केली. तसेच या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष एकत्र आले होते. याद्वारे पंतप्रधान मोदींनी जग जिंकले असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच नवी दिल्लीतील या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.


 


तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास वेगाने होत असून अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचा अनुभव परिषदेत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील