मुंबई: भारताची राजधानी नवी दिल्लीत नुकतीच जी-२० शिखर परिषद(g-20 summit) अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या परिषदेसाठी जगभरातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताने या परिषदेचे यशस्वीपणे यजमानपद सांभाळले.
दोन दिवसांच्या या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील नेत्यांनी चर्चा केली. तसेच या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष एकत्र आले होते. याद्वारे पंतप्रधान मोदींनी जग जिंकले असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच नवी दिल्लीतील या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.
तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास वेगाने होत असून अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचा अनुभव परिषदेत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
परिसरात धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी टळली पुणे : पुण्यात आज पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने…
जाणून घ्या काय आहे नवीन रिचार्ज प्लॅन मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ (Jio) आणि…
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा मुंबई : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session…
मुंबई : मुंबई शहरातील विरार हे एक गजबजलेले उपनगर आहे. मुंबईत असले तरीही अनेकजण या…
लवकरच येणार 'ती' न्यूज... मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान…
दुर्घटनेत ५ जवान शहीद लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.…