Maratha reservation: जालना आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या(maratha reservation) आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत जालना तसेच राज्यातील मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


राज्यात कायदा-सुव्यवस्था आबाधित राहावी, जाती-जातीत तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आहे. जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्यात्यावेळेस ते ते राजकीय पक्ष तसेच विरोधी पक्षातील नेत्यांची अशा प्रकारची बैठक झाली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर सरकारने जालना तसेच राज्यात ज्या ठिकाणी आंदोलने झाली त्याबाबत दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


झालेल्या घटनेची खंत साऱ्यांनीच व्यक्त केली आहे. गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनीही जाहीरपणे माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. लाठीचार्जचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात त्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील हे ही आपले उपोषण मागे घेण्यास तयार नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६