Shivsena 16 MLA : १६ आमदारांच्या अपात्रतेवर अखेर 'या' दिवसापासून होणार सुनावणी

खरी शिवसेना कोणाची?


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एका वर्षाहून अधिक दिवस झाले असले तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली लागलेला नाही. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या निकालात एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी असल्याचे स्पष्ट झाले असले तरी कोर्टाने १६ आमदारांचा प्रश्न मात्र विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी या प्रकरणी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट (Thackeray Group) या दोन्ही पक्षांकडून उत्तर मागितले होते. दोन्ही गटांनी आपापले उत्तर दाखल केले असून अखेर राहुल नार्वेकरांनी सुनावणीची तारीख जाहीर केली आहे.


खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ते येत्या १४ सप्टेंबरपासून प्रत्येक आमदाराची सलग सुनावणी घेणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.


शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने परस्परांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभेचे अध्यक्ष यानिमित्ताने दाखल झालेल्या विविध याचिकांवर यादिवशी सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही गटाचे आमदार एकत्र येणार असून वाद आणि प्रतिवाद करणाऱ्या आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. आता त्याचा निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल