Shivsena 16 MLA : १६ आमदारांच्या अपात्रतेवर अखेर 'या' दिवसापासून होणार सुनावणी

  122

खरी शिवसेना कोणाची?


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एका वर्षाहून अधिक दिवस झाले असले तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली लागलेला नाही. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या निकालात एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी असल्याचे स्पष्ट झाले असले तरी कोर्टाने १६ आमदारांचा प्रश्न मात्र विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी या प्रकरणी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट (Thackeray Group) या दोन्ही पक्षांकडून उत्तर मागितले होते. दोन्ही गटांनी आपापले उत्तर दाखल केले असून अखेर राहुल नार्वेकरांनी सुनावणीची तारीख जाहीर केली आहे.


खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ते येत्या १४ सप्टेंबरपासून प्रत्येक आमदाराची सलग सुनावणी घेणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.


शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने परस्परांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभेचे अध्यक्ष यानिमित्ताने दाखल झालेल्या विविध याचिकांवर यादिवशी सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही गटाचे आमदार एकत्र येणार असून वाद आणि प्रतिवाद करणाऱ्या आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. आता त्याचा निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत