Asia cup 2023: सुपर ४मध्ये आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) आज दुसऱ्यांदा भारत (india) आणि पाकिस्तान (pakistan) आमनेसामने येत आहेत. सुपर ४च्या फेरीचा हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळवण्यात येईल. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्यात फलंदाजांची परीक्षा असेल.


खासकरून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रऊफ आणि नसीम शाह मोठे आव्हान ठरू शकतात. कोहली आणि रोहित नेहमीच शाहीनविरुद्ध खेळताना स्ट्रगल करताना दिसले आहेत.


मात्र कोलंबोची ही पिच आज कोहली आणि रोहितची खरी अग्निपरीक्षा घेतील. खरंत, कोलंबोची ही पिच गोलंदाजांसाठी सहाय्यक ठरू शकते. जर आकाशात काळे ढग असतील तर वेगवान गोलंदाजांसाठी हे सहाय्यकच ठरू शकते. ज्या प्रमाणे कोलंबोचे हवामान आहे त्यानुसार येथे काळे ढग दाटलेले असण्याची शक्यता आहे.



पिच रिपोर्ट


कोलंबोची पिच फलंदाजांसाठी अनुकूल असणार नाही. म्हणजेच एका एका धावेसाठी येथील फलंदाज झुंजताना दिसेल. श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही असे पाहायला मिळाले होते.



दोन्ही संघात वेगवान गोलंदाज


भारत आणि पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाज आहे. पाकिस्तानी संघात शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रऊफ, नसीम शाह आणि फहीम अश्रफसारखे स्टार वेगवान गोलंदाज आहेत. तर भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, याशिवाय मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यापैकी एकाला संधी मिळू शकते. या सामन्यात शार्दूल ठाकूरही खेळताना दिसू शकतो.



भारताविरुद्ध पाकिस्तानचे प्लेईंग ११


बाबर आजम (कर्णधार), फखर जमां, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), शादाब खान (उप-कर्णधार), फहीम अशरफ, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफरीदी.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून