G20 Summit 2023 : जी-२० परिषदेचा समारोप; नोव्हेंबर अखेरीस होणार व्हर्च्युअल सत्र

ब्राझीलकडे पुढील अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द


नवी दिल्ली : भारताकडे अध्यक्षपदाची जबबादारी असलेल्या भव्य जी-२० परिषदेचा (G20 Summit 2023) आज समारोप झाला. या परिषदेसाठी दिल्ली येथे जगभरातून २९ देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपती तसेच जवळपास १,००० विदेशी पाहुणे सहभागी झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या परिषदेचा समारोप करताना 'एक भविष्य' (One Future) या विषयावर चर्चा केली आणि समारोपाची घोषणा केली. यावेळेस पंतप्रधानांनी जागतिक शांततेचा संदेश दिला आणि १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह सर्वांचे आभार मानले.


समारोपाची घोषणा करताना पंतप्रधानांनी नोव्हेंबरच्या शेवटी सर्व नेत्यांना पुन्हा एकदा व्हर्च्युअल माध्यमातून भेटण्याचे आणि या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की, नोव्हेंबरपर्यंत जी-20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे. अजून अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसात तुम्ही सर्वांनी अनेक गोष्टी इथे मांडल्या, सूचना दिल्या, अनेक प्रस्ताव आले. त्या प्रस्तावांना गती कशी मिळेल, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. आपण नोव्हेंबरच्या शेवटी जी-२० चे आणखी एक व्हर्च्युअल सत्र आयोजित करू आणि त्या सत्रात या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ.'



समारोपाची घोषणा


परिषदेच्या शेवटी पंतप्रधानांनी जी-२०चे पुढील वर्षाचे अध्यक्षपद सांभाळणार्‍या ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे पुढील सुत्रे सुपूर्द केली. ‘युअर हायनेस, एक्सीलेंस यासोबतच मी जी-२० शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा करतो. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्याचा आनंददायी असावं. स्वस्ति अस्तु विश्वस्य म्हणजे संपूर्ण जगात आशा आणि शांती असावी. १४० कोटी भारतीयांकडून शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार,' असा संदेश मोदींनी यावेळी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे