Air hostess case : मुंबई एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

  284

लॉकअपमध्येच लावून घेतला गळफास


मुंबई : मुंबईतील (Mumbai) पवई भागातील मरोळ येथे भाड्याने एका फ्लॅटमध्ये आपल्या मित्रांसमवेत राहणार्‍या रुपल ओगरे (Rupal Ogrey) या २३ वर्षीय एअर हॉस्टेसची (Air Hostess) हत्या झाल्याची बातमी सोमवारी समोर आली होती. या हत्येप्रकरणी इमारतीच्या एका सफाई कर्मचार्‍याला अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपीसंदर्भात एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आरोपी विक्रम आटवालने अंधेरी येथे लॉकअपमध्ये (Andheri Police station) असतानाच पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावत आत्महत्या (Suicide) केली आहे.


आरोपी विक्रम याला रुपलच्या हत्या प्रकरणात अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळेस त्याला ८ सप्टेंबर म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच विक्रमने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला साडेसातच्या सुमारास रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रमने त्याच्या अंगावरील पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावला. विक्रमने आत्महत्या का केली असावी, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण एअर होस्टेसवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. मात्र अटकेनंतर त्याने पोलिसांना बरीच उडवाउडवीची उत्तरं दिली होती. अखेर आज अंधेरी पोलीस स्टेशनमध्येच त्याने आपलं जीवन संपवलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.