Air hostess case : मुंबई एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

लॉकअपमध्येच लावून घेतला गळफास


मुंबई : मुंबईतील (Mumbai) पवई भागातील मरोळ येथे भाड्याने एका फ्लॅटमध्ये आपल्या मित्रांसमवेत राहणार्‍या रुपल ओगरे (Rupal Ogrey) या २३ वर्षीय एअर हॉस्टेसची (Air Hostess) हत्या झाल्याची बातमी सोमवारी समोर आली होती. या हत्येप्रकरणी इमारतीच्या एका सफाई कर्मचार्‍याला अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपीसंदर्भात एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आरोपी विक्रम आटवालने अंधेरी येथे लॉकअपमध्ये (Andheri Police station) असतानाच पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावत आत्महत्या (Suicide) केली आहे.


आरोपी विक्रम याला रुपलच्या हत्या प्रकरणात अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळेस त्याला ८ सप्टेंबर म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच विक्रमने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास लावत आत्महत्या केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला साडेसातच्या सुमारास रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रमने त्याच्या अंगावरील पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावला. विक्रमने आत्महत्या का केली असावी, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण एअर होस्टेसवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. मात्र अटकेनंतर त्याने पोलिसांना बरीच उडवाउडवीची उत्तरं दिली होती. अखेर आज अंधेरी पोलीस स्टेशनमध्येच त्याने आपलं जीवन संपवलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या