Wamanrao Pai : आवड हे आनंदाचे रूप...


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


एके ठिकाणी नामदेव महाराजांनी किती सुंदर म्हटले आहे बघा, “आपुलीच आवडी धरोनी खेळीया आप आपणांते व्याला रे” तो आपल्याच ठिकाणी असणारी आवड म्हणजे आनंद घेऊन व्याला. आवड हे आनंदाचे रूप आहे, हे लक्षात ठेवायचे म्हणून जगात प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी आवड असते. या आवडीचे महत्त्व इतके आहे की, त्याची आवड लक्षात घेऊन जर माणसाला develop केले, तर तो जगात मोठा होऊ शकतो.


एखाद्या मुलाला इंजिनीअर होण्याची आवड आहे व बाप आहे वकील आणि बापाच्या इच्छेप्रमाणे तो वकील होण्याचा प्रयत्न करू लागला, तर तो तिथेच अपयशी होणार व आवड इंजिनीअरिंगची म्हणून इंजिनीअरिंगला गेला, तर यशस्वी होणार. मुलाला काय आवडते ते पाहून develop केले पाहिजे. आपली आवड त्याच्यावर लादता कामा नये. आजकाल काय झालेले आहे, आई-वडील ठरवतात मुलांनी काय करायचे ते. कुठे जायचे हे आई-वडील ठरवतात. आई-वडिलांपेक्षाही मित्रमैत्रिणी ठरवतात. पूर्वीच्या काळी आई-वडील ठरवत होते, आता मित्रमैत्रिणी ठरवतात. आई-वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी काय सांगतात, यावर मुलांचा जास्त विश्वास असतो. अशाने होते काय? आवड असते एक व आपण गेलो दुसरीकडे, तर आपण कधीच success होऊ शकत नाही. मुलांवर कुठलीही जबरदस्ती करू नये. त्याच्या आवडीप्रमाणे त्याने मार्ग अवलंबिला, तर तो जीवनात success होऊ शकतो.


सांगायचा मुद्दा, आवड हे आनंदाचे रूप आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला कशाची न कशाची आवड असतेच, कारण प्रत्येकाच्या ठिकाणी आनंद आहे ज्याला आपण स्वानंद म्हणतो. आनंद व स्वानंद यांत फरक आहे. हा स्वानंदाच आनंदावर येतो. हा आनंद आपण दुसऱ्याला देतो, तेव्हा होते ते सुख. ते सुख आपल्याकडे परिवर्तीत होते तेव्हा आपल्याला होते ते समाधान. लक्षात आले की नाही. आम्ही काय सांगतो, “आनंद वाटा आनंद लुटा.” प्रथम आनंद वाटायला शिका म्हणजे आनंद लुटता येईल. लोकांना असे वाटते की, आमच्याकडे आनंदच नाही, तर आम्ही आनंद वाटणार काय व लुटणार काय?


जीवनविद्या सांगते तुमच्याकडे आनंदाचा सागर आहे. तुम्ही आनंदाचा समुद्र आहात व तो कधीही आटत नाही. समुद्र कधी आटला आहे का? समुद्र कधीही आटत नाही, तो कधीही विटत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हा आनंद आपल्या ठिकाणी आहेच. तुम्ही जेव्हा आनंद द्यायला लागता, तेव्हा आनंद बाहेर यायला लागतो. देण्याची क्रिया महत्त्वाची आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन