Hello UPI : आता इंटरनेटशिवाय केवळ फोन कॉल करुन पाठवता येणार पैसे

काय आहे एनपीसीआयचे नवे फीचर?


मुंबई : डिजीटल होण्याकडे भारत यशस्वी पावले उचलत आहेत. भारतात जितक्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट केले जाते तितके अजून कोणत्याही देशात केले जात नाही. डिजिटल माध्यमातून देशातील यूपीआय (UPI) पेमेंट सुविधा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. जगभरातील कित्येक देशांमध्ये देखील आता यूपीआय पेमेंट करता येत आहे. ही सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता एनपीसीआयने (NPCI) एक नवीन फीचर लाँच केलं आहे.


एनपीसीआयच्या या नवीन फीचरमध्ये इंटरनेटचीही गरज भासणार नाही. यात केवळ फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. या फीचरचे नाव आहे 'हॅलो यूपीआय'. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये याबाबत घोषणा केली. यासोबतच, यूपीआयबाबत आणखी नवे फीचर्स देखील यावेळी लाँच करण्यात आले.



कसं असणार हॅलो यूपीआय?


'हॅलो यूपीआय' या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी यूजर्स आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ग्राहक एका ठराविक नंबरवर कॉल करू शकतात. यासाठी विविध बँकांसाठी वेगवेगळे नंबर देण्यात आले आहेत. या नंबरवर कॉल करुन, आपल्या बँकेचं नाव सांगावं लागणार आहे. सोबतच, ट्रान्झॅक्शनचा प्रकार सांगून, शेवटी यूपीआय PIN च्या मदतीने तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. ही सुविधा सध्या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे तसेच यातून केवळ १०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत. लवकरच यात अन्य भाषादेखील येतील, असं एनपीसीआयने स्पष्ट केलं.



आणखी फीचर्स लाँच


यासोबतच यूपीआयवर क्रेडिट लाईन हे फीचरही लाँच करण्यात आलं आहे. या माध्यमातून यूजर्सना बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड लोन मिळू शकतं. सोबतच, आधीपासून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्याने यूपीआय प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन करता येईल. यासोबतच 'लाईट एक्स' नावाचं आणखी एक प्रॉडक्ट NPCI ने लाँच केलं आहे. इंटरनेट शिवाय व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येईल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील