Pak vs Ban: पाकिस्तानने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले

लाहोर : आशिया चषक २०२३ (asia cup 2023) मधील सुपर ४मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने (pakistan) बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या संघाने आपल्या देशात २०० वा वनडे सामना खेळला.


बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघाला ३८.४ ओव्हरमध्ये १९३ धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या संघाने १९४ धावांचे आव्हान ३९.३ ओव्हरमध्ये पूर्ण केले. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक ७८ धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने नाबाद ६३ धावा केल्या.


याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजाच्या तिकडीने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. हरिस रऊफने ४, नसीम शाहने ३ आणि शाहीन आफ्रिदीने १ विकेट घेतला. बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसनने ५७ चेंडूत ५३ धावा केल्या. तर मुशफिकुर रहीमने ८७ चेंडूत ६४ धावा केल्या.


बांगलादेशने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताच बदल केला नाही. पाकिस्तानच्या संघाने प्लेईंग ११ आधीच घोषित केली होती. बाबर आझमने आपल्या संघात बदल केला. मोहम्मद नवाजच्या जागी फहीम अश्रफला संधी दिली.


सुपर ४मधील पुढील सामना ९ सप्टेंबरला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात केआर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाईल. सुपर ४मध्ये ग्रुप एमधून भारत आणि पाकिस्तान पोहोचले आहेत. ग्रुप बीमधून श्रीलंका आणि बांगलादेश पोहोचलेत. सुपर ४मध्ये एक संघ ३ सामने खेळले. टॉप २ संघ फायनलमध्ये खेळतील.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स