Nitesh Rane : मराठा नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्री कसे केले?

  140

आमदार नितेश राणे यांचा शरद पवारांना सवाल


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जातीवरुन लक्ष्य केले आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री कसे केले? असा रोखठोक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.


राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे. यावर ते म्हणाले, जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे जातीय राजकारण सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जे मराठा नसल्याने टीका केली जात आहे. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांना टीकणारे आरक्षण दिले होते.



तसेच मला शरद पवारांना प्रश्न विचारायचा आहे. की, फडणवीसांच्या फक्त जातीवर राग आहे की, त्यांच्यावर राग आहे. मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंची निवड कशी काय केली? ज्या ठाकरेंनी त्यांच्या मुखपत्रामध्ये मराठ्यांच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हटले आहे. त्यांना मुख्यमंत्री का केले?


पुढे राणे म्हणाले की, मराठ्यांच्या वंशजांना पुरावे मागणारे उद्धव ठाकरे चालतात मग फडणवीसांवर का वैयक्तिक आणि जातीय टीका केली जाते? याचे उत्तर मराठा समाजाला हवे आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास काम केली. म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक आणि जातीय टीका केली जात आहे. हे षडयंत्र लवकर थांबवावे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी