मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जातीवरुन लक्ष्य केले आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री कसे केले? असा रोखठोक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे. यावर ते म्हणाले, जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे जातीय राजकारण सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जे मराठा नसल्याने टीका केली जात आहे. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांना टीकणारे आरक्षण दिले होते.
तसेच मला शरद पवारांना प्रश्न विचारायचा आहे. की, फडणवीसांच्या फक्त जातीवर राग आहे की, त्यांच्यावर राग आहे. मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंची निवड कशी काय केली? ज्या ठाकरेंनी त्यांच्या मुखपत्रामध्ये मराठ्यांच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हटले आहे. त्यांना मुख्यमंत्री का केले?
पुढे राणे म्हणाले की, मराठ्यांच्या वंशजांना पुरावे मागणारे उद्धव ठाकरे चालतात मग फडणवीसांवर का वैयक्तिक आणि जातीय टीका केली जाते? याचे उत्तर मराठा समाजाला हवे आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास काम केली. म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक आणि जातीय टीका केली जात आहे. हे षडयंत्र लवकर थांबवावे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…