Nitesh Rane : मराठा नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्री कसे केले?

आमदार नितेश राणे यांचा शरद पवारांना सवाल


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जातीवरुन लक्ष्य केले आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री कसे केले? असा रोखठोक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.


राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली जात आहे. यावर ते म्हणाले, जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे जातीय राजकारण सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जे मराठा नसल्याने टीका केली जात आहे. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांना टीकणारे आरक्षण दिले होते.



तसेच मला शरद पवारांना प्रश्न विचारायचा आहे. की, फडणवीसांच्या फक्त जातीवर राग आहे की, त्यांच्यावर राग आहे. मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंची निवड कशी काय केली? ज्या ठाकरेंनी त्यांच्या मुखपत्रामध्ये मराठ्यांच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हटले आहे. त्यांना मुख्यमंत्री का केले?


पुढे राणे म्हणाले की, मराठ्यांच्या वंशजांना पुरावे मागणारे उद्धव ठाकरे चालतात मग फडणवीसांवर का वैयक्तिक आणि जातीय टीका केली जाते? याचे उत्तर मराठा समाजाला हवे आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास काम केली. म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक आणि जातीय टीका केली जात आहे. हे षडयंत्र लवकर थांबवावे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन !

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ३ या

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा