Bharat: 'इंडिया' ऐवजी 'भारत' ला मुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा, केले ट्वीट

मुंबई: नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रात इंडिया (india) ऐवजी भारत (bharat) या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून देशात वातावरण चांगलेच तापले आहे.


जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्र समोर आल्यानंतर यावरून केवळ सवाल उपस्थित केले जात नाही आहेत तर भारत वि इंडिया असे महाभारत सुरू झाले आहे. भारत वि इंडियावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. एकीकडे काँग्रेसने आरोप केला आहे की सरकार इंडिया शब्द हटवत आहे. तर भाजपाकडून यासाठी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतल्यास त्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो असे त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री


केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे.


देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is 'Bharat' असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे.


देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 'भारतमाता की जय' हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती.


साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला 'भारत' या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.


भारतमाता की जय!


 


भाजपचे अनेक मंत्री केंद्र सरकारने उचललेल्या या पावलाबद्दल कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र यावरून जोरदार टीका करत आहेत.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता