Bharat: 'इंडिया' ऐवजी 'भारत' ला मुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा, केले ट्वीट

मुंबई: नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रात इंडिया (india) ऐवजी भारत (bharat) या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून देशात वातावरण चांगलेच तापले आहे.


जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्र समोर आल्यानंतर यावरून केवळ सवाल उपस्थित केले जात नाही आहेत तर भारत वि इंडिया असे महाभारत सुरू झाले आहे. भारत वि इंडियावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. एकीकडे काँग्रेसने आरोप केला आहे की सरकार इंडिया शब्द हटवत आहे. तर भाजपाकडून यासाठी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतल्यास त्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो असे त्यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री


केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे.


देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is 'Bharat' असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे.


देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 'भारतमाता की जय' हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती.


साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला 'भारत' या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.


भारतमाता की जय!


 


भाजपचे अनेक मंत्री केंद्र सरकारने उचललेल्या या पावलाबद्दल कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र यावरून जोरदार टीका करत आहेत.

Comments
Add Comment

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे

BMC News : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्या कापल्या

मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा (Rain) लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६