India vs pakistan: आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने

  155

पल्लेकल: रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (indian cricket team) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघाने आपला दुसरा सामना सोमवारी नेपाळविरुद्ध खेळला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या खेळात टीम इंडियाने १० विकेटनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.


नेपाळविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने सुपर ४मध्ये प्रवेश केला आहे. यासोबत क्रिकेट चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेचा अखेरचा सामना १७ सप्टेंबरला रंगणार आहे.



पाकिस्तान-नेपाळविरुद्ध दिसल्या कमकुवत बाजू


भारतीय संघाने आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि २६६ धावा केल्या होत्या. यात भारताला गोलंदाजी करता आली नाही.



क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची


नेपाळविरुद्ध भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमकुवत असल्याचे दिसले. सुरूवातीच्या २६ बॉलमध्येच भारताने ३ सोपे कॅच सोडले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदीसमोर फ्लॉप दिसले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी