India vs pakistan: आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने

  158

पल्लेकल: रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (indian cricket team) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघाने आपला दुसरा सामना सोमवारी नेपाळविरुद्ध खेळला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या खेळात टीम इंडियाने १० विकेटनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.


नेपाळविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने सुपर ४मध्ये प्रवेश केला आहे. यासोबत क्रिकेट चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेचा अखेरचा सामना १७ सप्टेंबरला रंगणार आहे.



पाकिस्तान-नेपाळविरुद्ध दिसल्या कमकुवत बाजू


भारतीय संघाने आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि २६६ धावा केल्या होत्या. यात भारताला गोलंदाजी करता आली नाही.



क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची


नेपाळविरुद्ध भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमकुवत असल्याचे दिसले. सुरूवातीच्या २६ बॉलमध्येच भारताने ३ सोपे कॅच सोडले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदीसमोर फ्लॉप दिसले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार