Ram mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत मुख्यमंत्री योगींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : राम मंदिराच्या (ram mandir) उद्घाटनावरून वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी पंतप्रधान मोदींची (pm narendra modi) भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसोबतच्या या चर्चेमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. यात राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचाही सामील आहे. २०२४च्या आधी राम मंदिराचे उद्घाटन होऊ शकते. या भेटीदरम्यान यूपीचे एक मंत्री एके शर्मा आणि अयोध्याचे के डीएमही उपस्थित होते.



पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेतली भेट


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. २०२४च्या जानेवारी महिन्यात मंदिरात प्राण-प्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल. यावेळी मुख्यमंत्री योगींनी पंतप्रधान मोदींना राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमाची माहिती तसेच त्याच्या तयारीबद्दल माहिती दिली.



निर्मिती कार्य वेगाने सुरू


ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी काही दिवस आधी सांगितले होते की मंदिर निर्मितीचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतील. मात्र मंदिराच्या नवीन गर्भगृहात रामलला जानेवारी २०२४ पर्यंत विराजमान होतील. यानंतर मंदिराच्या काही भागांचे काम सुरू राहील.. दरम्यान गर्भगृहातील वरच्या भागाचे निर्मिती कार्य वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण