Ram mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत मुख्यमंत्री योगींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : राम मंदिराच्या (ram mandir) उद्घाटनावरून वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी पंतप्रधान मोदींची (pm narendra modi) भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसोबतच्या या चर्चेमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. यात राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचाही सामील आहे. २०२४च्या आधी राम मंदिराचे उद्घाटन होऊ शकते. या भेटीदरम्यान यूपीचे एक मंत्री एके शर्मा आणि अयोध्याचे के डीएमही उपस्थित होते.



पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेतली भेट


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. २०२४च्या जानेवारी महिन्यात मंदिरात प्राण-प्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल. यावेळी मुख्यमंत्री योगींनी पंतप्रधान मोदींना राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमाची माहिती तसेच त्याच्या तयारीबद्दल माहिती दिली.



निर्मिती कार्य वेगाने सुरू


ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी काही दिवस आधी सांगितले होते की मंदिर निर्मितीचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतील. मात्र मंदिराच्या नवीन गर्भगृहात रामलला जानेवारी २०२४ पर्यंत विराजमान होतील. यानंतर मंदिराच्या काही भागांचे काम सुरू राहील.. दरम्यान गर्भगृहातील वरच्या भागाचे निर्मिती कार्य वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च