Asia Cup 2023: आशिया चषकात मोठा बदल, भारत-पाकिस्तानसह सुपर ४चे सामने रंगणार या ठिकाणी

मुंबई: आशिया चषक २०२३बाबत (asia cup 2023) एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेदरम्यानच आशियाई क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये होणाऱ्या फायनलसह सुपर ४ मधील सर्व सामने हम्बनटोटा येथे शिफ्ट करण्यात आले आहेत.


सामने शिफ्ट करण्याबाबत पल्लेकल आणि दांबुला या ठिकाणचा विचार केला जात होता. मात्र आता हे सामने हम्बनटोटा येथे शिफ्ट करण्यात आले आहेत. कोलंबोमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस या ठिकाणी सतत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. याच कारणामुळे एसीसीने येथील सामने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले आहेत.



१७ सप्टेंबरला रंगणार फायनल सामना


श्रीलंकेचे शहर हम्बनटोटा हे दक्षिणेला आहे. हे ठिकाण कोरडे असते. तर कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पल्लेकल आणि दाम्बुलामध्येही पावसाची शक्यता आहे. अशातच एसीसीने कोलंबोमधील सर्व सामने हम्बनटोटा येथे शिफ्ट केलेत. आता आशिया चषकातील सर्व सामने तसेच फायनलचा सामनाही याच मैदानावर रंगणार आहे.



भारत-पाकिस्तान दुसरा सामनाही याच मैदानावर


आशिया चषक २०२३मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना रंगला होता. मात्र पल्लेकल स्टेडियममध्ये पाऊस झाल्याने सामना मध्येच रद्द करावा लागला. या सामन्यात भारताने बॅटिंग केली होती. मात्र पाकिस्तानच्या संघाला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.


भारत जर आशिया चषकमध्ये सुपर ४ साठी क्वालिफाय झाला तर भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रंगू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार होता मात्र आता हा सामना हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील