Ganeshostav : गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की ढोलताशा पथक, मिरवणुका, विसर्जन सोहळा हे सर्व काही मोठ्या थाटामाटात असते. कोरोनामुळे दोन-तीन वर्षे गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरी करताना अनेक प्रकारच्या अटी होत्या. मात्र यंदा गणेशोत्सवात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यंदा लाऊडस्पीकर लावण्याबाबत सरकारकडून मोठी सूट देण्यात आली आहे.


गणेशोत्सवातील ४ दिवस १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी दिली आहे. परवानगी देण्यात आलेले हे चार दिवस म्हणजे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन तसेच ५, ९ तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला