Ganeshostav : गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की ढोलताशा पथक, मिरवणुका, विसर्जन सोहळा हे सर्व काही मोठ्या थाटामाटात असते. कोरोनामुळे दोन-तीन वर्षे गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरी करताना अनेक प्रकारच्या अटी होत्या. मात्र यंदा गणेशोत्सवात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यंदा लाऊडस्पीकर लावण्याबाबत सरकारकडून मोठी सूट देण्यात आली आहे.


गणेशोत्सवातील ४ दिवस १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी दिली आहे. परवानगी देण्यात आलेले हे चार दिवस म्हणजे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन तसेच ५, ९ तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक