Ganeshostav : गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

  212

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की ढोलताशा पथक, मिरवणुका, विसर्जन सोहळा हे सर्व काही मोठ्या थाटामाटात असते. कोरोनामुळे दोन-तीन वर्षे गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरी करताना अनेक प्रकारच्या अटी होत्या. मात्र यंदा गणेशोत्सवात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यंदा लाऊडस्पीकर लावण्याबाबत सरकारकडून मोठी सूट देण्यात आली आहे.


गणेशोत्सवातील ४ दिवस १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी दिली आहे. परवानगी देण्यात आलेले हे चार दिवस म्हणजे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन तसेच ५, ९ तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.