Ganeshostav : गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की ढोलताशा पथक, मिरवणुका, विसर्जन सोहळा हे सर्व काही मोठ्या थाटामाटात असते. कोरोनामुळे दोन-तीन वर्षे गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरी करताना अनेक प्रकारच्या अटी होत्या. मात्र यंदा गणेशोत्सवात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यंदा लाऊडस्पीकर लावण्याबाबत सरकारकडून मोठी सूट देण्यात आली आहे.


गणेशोत्सवातील ४ दिवस १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिभावकर यांनी दिली आहे. परवानगी देण्यात आलेले हे चार दिवस म्हणजे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन तसेच ५, ९ तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण