India vs Nepal: नेपाळला हरवत भारत आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये

  202

पल्लेकल: भारत आणि नेपाळ (India vs nepal) यांच्यात रंगलेल्या आशिया चषकातील सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला आहे. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १० विकेट राखत पूर्ण केले.


या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या संघाला २३० धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने फलंदाजीस सुरूवात केली मात्र त्याचवेळी पावसाने खोडा घातला.


पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर सामन्यातील षटके कमी करण्यात आली. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावा करायच्या होत्या. भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली फटकेबाजी करत हे आव्हान पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.


सलामीवीर रोहित शर्माने ५९ बॉलमध्ये ७४ धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने ६२ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. भारताने आपला एकही विकेट न गमावता नेपाळचे १४५ धावांचे आव्हान पूर्ण केले.


याआधी भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे केवळ एकच गुण मिळाला होता. त्या सामन्यात भारताने फलंदाजी केली मात्र त्यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला फलंदाजी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. याच्या जोरावर पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला. त्यानंतर आता भारताने सुपर ४ची फेरी गाठली आहे.

Comments
Add Comment

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत