India vs Nepal: नेपाळला हरवत भारत आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये

Share

पल्लेकल: भारत आणि नेपाळ (India vs nepal) यांच्यात रंगलेल्या आशिया चषकातील सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला आहे. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १० विकेट राखत पूर्ण केले.

या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या संघाला २३० धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने फलंदाजीस सुरूवात केली मात्र त्याचवेळी पावसाने खोडा घातला.

पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर सामन्यातील षटके कमी करण्यात आली. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावा करायच्या होत्या. भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली फटकेबाजी करत हे आव्हान पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.

सलामीवीर रोहित शर्माने ५९ बॉलमध्ये ७४ धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने ६२ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. भारताने आपला एकही विकेट न गमावता नेपाळचे १४५ धावांचे आव्हान पूर्ण केले.

याआधी भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे केवळ एकच गुण मिळाला होता. त्या सामन्यात भारताने फलंदाजी केली मात्र त्यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला फलंदाजी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. याच्या जोरावर पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला. त्यानंतर आता भारताने सुपर ४ची फेरी गाठली आहे.

Recent Posts

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

25 mins ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

2 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

2 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

2 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

3 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

4 hours ago