India vs Nepal: नेपाळला हरवत भारत आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये

  207

पल्लेकल: भारत आणि नेपाळ (India vs nepal) यांच्यात रंगलेल्या आशिया चषकातील सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला आहे. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १० विकेट राखत पूर्ण केले.


या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या संघाला २३० धावाच करता आल्या. त्यानंतर भारताने फलंदाजीस सुरूवात केली मात्र त्याचवेळी पावसाने खोडा घातला.


पावसाचा व्यत्यय आल्याने अखेर सामन्यातील षटके कमी करण्यात आली. भारताला विजयासाठी २३ षटकांत १४५ धावा करायच्या होत्या. भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली फटकेबाजी करत हे आव्हान पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.


सलामीवीर रोहित शर्माने ५९ बॉलमध्ये ७४ धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने ६२ बॉलमध्ये ६७ धावांची खेळी केली. भारताने आपला एकही विकेट न गमावता नेपाळचे १४५ धावांचे आव्हान पूर्ण केले.


याआधी भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे केवळ एकच गुण मिळाला होता. त्या सामन्यात भारताने फलंदाजी केली मात्र त्यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला फलंदाजी करता आली नाही. पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला. याच्या जोरावर पाकिस्तानचा संघ सुपर ४मध्ये पोहोचला. त्यानंतर आता भारताने सुपर ४ची फेरी गाठली आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र